राजूर ग्रामपंचायतीत सरपंच व सचिवांचा मनमानी कारभार, सदस्य व गावकऱ्यांनी केली बीडीओंकडे तक्रार

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या राजूर ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे गावातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. सरपंच व सचिव मनमर्जी कामे करीत असल्याने गावकऱ्यांमध्ये रोष दिसून येत आहे. सरपंच व सचिवच ग्रांमपंचायतेचा कारभार हाकत असून सदस्य व गावकऱ्यांना विश्वासात न घेताच महत्वाचे निर्णय घेतले जात असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. सरपंच व सचिवांनी ग्रामसभा न घेताच घरकुलासाठी लाभार्थ्यांची यादी तयार केली असून गरीब व दुर्बल घटकांना घरकुलाच्या लाभापासून डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्रामपंचायतेत सरपंच व सचिवांचा मनमानी कारभार सुरु असून त्यांच्या मनमर्जी धोरणामुळे ग्रामवासी पुरते वैतागले आहेत. गावातील समस्यांकडेही सरपंच व सचिवांचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. गावात डेंग्यू व मलेरिया सारख्या गंभीर आजारांची साथ आलेली असतांना ग्रामपंचायतेकडून मात्र कोणत्याही उपाययोजना होतांना दिसत नाही. सरपंच व सचिवांनी मनमर्जी धोरण अवलंबले असून त्यांच्या या धोरणामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे सरपंच व सचिवांच्या कार्य पद्धतीत सुधारणा करण्याकरीता त्यांची कानउघडणी करण्याची मागणी वजा तक्रार ग्रा.प. सदस्य व गावकऱ्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. सरपंच व सचिव यांच्यावर उचित कार्यवाही न केल्यास संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही तक्रार अर्जातून देण्यात आला आहे. 

राजूर ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिवांनी हम करे सो कायदा हे धोरण अवलंबले आहे. सरपंच व सचिवांनी ग्रामसभा न घेता स्वतःच महत्वाचे निर्णय घेणे सुरु केले आहे. घरकुलाच्या लाभार्थ्यांचीही यादी त्यांनी स्वतःच तयार केली आहे. गरीब व दुर्बल घटकांना घरकुलाच्या लाभापासून वंचित ठेऊन आपल्या मर्जीतील लोकांना घरकुल देण्याचा त्यांनी प्रयत्न चालविला आहे. मासिक सभाही अनेकदा तहकूब करण्यात आल्या आहेत. ग्रा.प. सदस्य व गावकऱ्यांशी कुठल्याही प्रकारची चर्चा न करता मनमर्जी निर्णय घेतले जात आहे. त्यांच्या मनमर्जी धोरणामुळे गावाच्या विकासाला खीळ बसली असून गावात समस्या वाढू लागल्या आहेत. समस्यांचे निवारण करण्याकडेही सरपंच व सचिव लक्ष घालतांना दिसत नाही. गावात मलेरिया व डेंग्यूची साथ सुरु असून गावकरी या आजारांनी फणफणत आहेत. पण सरपंच व सचिव मात्र कोणत्याही उपाययोजना करतांना दिसत नाही. ग्रामपंचायतेत सरपंच व सचिवांचा मनमानी कारभार सुरु आहे. त्यांनी मनमर्जी धोरण अवलंबल्याने गावकऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष खदखदत आहे. ग्रामपंचायतेत सरपंच व सचिवांची मनमर्जी सुरु असल्याने दुर्बल घटक शासकीय लाभापासून वंचित राहू लागले आहेत. त्यामुळे सरपंच व सचिवांची कानउघडणी करून त्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याची मागणी वजा तक्रार ग्रा.प. सदस्य व गावकऱ्यांनी बीडीओ कडे केली आहे. त्यांच्यावर उचित कार्यवाही न केल्यास संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही तक्रार अर्जातून देण्यात आला आहे.  

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी