Posts

Showing posts from March, 2023

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला समारोह समितीचा तहसील कार्यालयावर मोर्चा, मुख्यमंत्रांना पाठविले मागण्यांचे निवेदन

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   महागाईचे चटके सोसणाऱ्या जनतेला राज्य शासनाने दिलासा देण्याकरिता गगनाला भिडलेल्या जिवनावश्यक वतुंच्या किंमती कमी कराव्या, या मागणीसह इतर काही मागण्यांना घेऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला समारोह समिती वणी, मारेगाव व झरीच्या वतीने काल २८ मार्चला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राज्य परिवहन महामंडळाच्या बस मधून प्रवास करणाऱ्या महिलांना टिकिट दरात ५० टक्के सूट देऊन शासनाने महिलांचा प्रवासखर्च कमी केला. त्याप्रमाणे गॅस सिलेंडरचे दरही ४०० ते ५०० रुपये करून जनतेला गृहखर्चात दिलासा द्यावा या मागणीसह इतर काही मागण्या उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनातून महिलांनी केल्या आहेत.  महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या महिलांना टिकिट दरात ५० टक्के सूट जाहीर केली. शासनाचा हा अतिशय अभिनंदनीय निर्णय आहे. ज्याप्रमाणे महिलांना प्रवास खर्चात दिलासा दिला. त्याचप्रमाणे वाढत्या महागाईतून जनतेला दिलासा देण्याची मागणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महि...

शहरात दूषित पाण्याचा पुरवठा होत असतानाच नळाच्या पाण्यात आढळल्या जंतू व अळ्या

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   शहरवासियांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने नगर पालिका प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न होतांना दिसत नाही. अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे शहरवासीयांचं आरोग्य धोक्यात येऊ लागलं आहे. नदीतून पाईपलाईन द्वारे येणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण व निर्जंतुकीकरण न करताच शहरात पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. नळाद्वारे अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमधून कमालीचा संताप व्यक्त होऊ लागला आहे. आता तर नळाच्या पाण्यामध्ये चक्क अळ्या आणि जंतू येऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नळाच्या पाण्यात आलेले जंतू व अळ्या गौरकार कॉलनी येथिल एका दक्ष युवतीने निदर्शनास आणून दिल्याने नगर पालिकेच्या जलशुद्धीकरणाचं पितळ उघडं पडलं आहे. नळाद्वारे दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना विषाणूजन्य आजाराचा धोका निर्माण झाला आहे. नळाद्वारे गढूळ पाणी व पाण्यात जंतू आढळल्याने नळाचे पाणी पिण्याकरिता वापराने म्हणजे आजाराला आमंत्रण देण्यासारखे असल्याच्या चर्चा आता शहरातुन ऐकायला मिळत आहे.  मागील काही महिन्यांपासून नळाद्वारे दू...

नगर पालिकेचं दुर्लक्षित धोरण दिवसाढवळ्या पथदिवे सुरु तर नाल्यांची साफसफाई बंद

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  नगर पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षितपणाचा फटका शहरवासीयांबरोबरच स्वतः नगर पालिकेलाही बसतांना दिसत आहे. नगर पालिका प्रशासन कोणतेही काम गंभीरतेने घेतांना दिसत नाही. मागील तीन दिवस विठ्ठलवाडी व गौरकार कॉलनी परिसरातील पथदिवे दिवसाढवळ्याही सुरूच होते. नगर पालिकेचा विद्युत विभाग भरदिवसा पथदिवे सुरु ठेऊन सूर्यप्रकाशाला आव्हान देतांना दिसत आहे. नगर पालिकेला पथदिव्यांच्या बिलाचा भरणाच करावा लागत नसल्यागत दिवसाढवळ्याही पथदिवे सुरु ठेवले जात आहे. तर दुसरीकडे नगर पालिका प्रशासनाचा दुर्लक्षितपणा नागरिकांचा मनःस्ताप वाढवू लागला आहे. शहरातील काही भागातील नाल्यांची मागील कित्येक दिवसांपासून साफसफाईच करण्यात आली नसल्याच्या तक्रारी नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. नाल्यांची साफसफाई न झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून डास व आजार पसरविणाऱ्या जंतूंची उत्पत्ती वाढली आहे. जागोजागी नाल्या तुंबल्याने घाण पाण्याची दुर्गंधी व डासांच्या प्रकोपाने नागरिक बेजार झाले आहेत. नगर पालिका प्रशासनाचं नाल्यांची साफसफाई व इतर मूलभूत सोई सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने नागरिकांमध्ये कमालीचा...

कास्तकाराला भरदिवसा लुटणाऱ्या आरोपींना काही तासांतच पोलिसांनी केली अटक

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी येथील जत्रा मैदानाजवळ एका कास्तकाराला तिघांनी मिळून लुटल्याची घटना २५ मार्चला दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. वाटमारी करणाऱ्यांमध्ये एका अप प्रवृत्तीच्या युवकासह महिला व एका विधी संघर्षग्रस्त मुलाचाही समावेश आहे. वणी येथील प्रसिद्ध असलेल्या बैल बाजारात आलेला कास्तकार आपल्या दुचाकीने गावाकडे जात असतांना आरोपींनी त्याच्या दुचाकीला लाथ मारून त्याला खाली पाडले. त्यानंतर त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या खिशातील रोख रक्कम व दुचाकी जबरदस्ती हिसकावून त्यांनी पळ काढला. याबाबत कास्तकाराने पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच वाटमारी करणाऱ्या या तिघांनाही अटक केली. अल्पवयीन मुलाला सूचनापत्रावर त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या वाटमारीच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्दळीच्या रस्त्यावर एखाद्याला भरदिवसा लुटण्यापर्यंत या अपप्रवृत्तीच्या लोकांच्या हिंमती वाढल्या आहेत. शहरातील प्रसिद्ध असलेल्या रंगनाथ स्वामी जत्रेला सुरुवात झाली असून जत्रे निमित्त यावर्षीही भव्य अस...

राजू उंबरकर नेते झाले आणि कार्यकर्त्यांचा दाटून आला उर, हार घालण्यासाठी हायड्रा तर जेसीबींनी केला फुलांचा वर्षाव

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष म्हणून राजकीय कारकीर्द गाजविलेले राजू उंबरकर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते झाले आहेत. राजकीय क्षेत्रातील त्यांचं अतुलनीय कार्य, प्रखर व्यक्तिमत्व व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या राजू उंबरकर यांना मनसेचे नेते म्हणून घोषित करण्यात आलं आहे. त्यांच्या सर्वसमावेशक कार्याची पावती म्हणून त्यांची मनसेच्या नेते पदी वर्णी लागली. झुंजारू व धुरंदर नेते म्हणून राजू उंबरकर यांची संपूर्ण विदर्भात ओळख असतांनाच आता हा विदर्भाचा ढाण्या वाघ अधिकृत नेता झाल्याने वणीकरांच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. राजकारणात प्रभावशाली कार्य, समाजकार्यात हिरीरीने सहभाग, संकटात देणारा आधार, कठीण प्रसंगातिल पाठीराखा तसेच शहरातील समस्या, शहरवासीयांचे प्रश्न, कास्तकारांवर होणारे अन्याय, बेरोजगार युवकांना देणारा न्याय, सखा, सोबती, जिवलग व हक्काचा माणूस म्हणून वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या गळ्यातील टाईत असलेले राजू उंबरकर आता मनसेचे नेते झाल्याने वणी उपविभागात आनंदाची लाट उसळली आहे.  महिलांचा भाऊराया व युवकांचा राजूदादा आ...

लग्नाचे आमिष दाखवून पाच वर्षांपासून तरुणीचे शारीरिक शोषण करणारा आरोपी गजाआड

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  प्रेमात अपेक्षाभंग झालेल्या प्रेमिकेने आपल्या प्रियकराविरुद्ध शारीरिक शोषणाची तक्रार नोंदविल्याने प्रियकराला अखेर तुरुंगाची हवा खावी लागली. २०१७ पासून सुरु असलेल्या प्रेम प्रकरणाचा शेवट पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीने झाला. तरुणीला प्रेमपाशात अडकवून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचे सतत शारीरिक शोषण करणाऱ्या प्रियकराविरुद्ध तिने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली आहे. लग्नाच्या भूलथापा देऊन तरुणीचे शारीरिक शोषण करणाऱ्या आरोपी विरुद्ध पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कार्यवाही काल २३ मार्चला रात्री उशिरा करण्यात आली.  प्रेमात आखंड बुडाल्यानंतर ते प्रणयात लिन झाले.  त्यांनी दीर्घकाळ एकमेकांच्या सहवासात घालविला. प्रेयसीने आपलं मन व तन दोन्ही त्याला अर्पण केलं. लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्यानंतर प्रियकराने मात्र दगा दिला. तिने आपलं सर्वस्व त्याला अर्पण केलं, पण त्याने सर्पणाची भावना ठेवली नाही. लग्नाच्या भूलथापा देऊन त्याने पाच वर्ष तिचं शारीरिक शोषण केलं.  शारीरिक संबंधातून गर्भधारणा झाल्यानंत...

दिलखुल्लास व्यक्तिमत्व असलेल्या राजू भाऊ तुराणकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   जीवनाच्या प्रवासात अनेक लोकांच्या भेटीगाठी होतात. परंतु काही माणसे अशी असतात जे त्यांच्या सुंदर स्वभावामुळे कायमचे स्मरणात राहून जातात. आशा व्यक्तीचे स्थान जीवनात आदरचे असते. आणि या आदरणीय व्यक्तीचे आपल्या जीवनातील महत्व व्यक्त करण्यासाठी त्यांच्या वाढदिवशी उत्तम शुभेच्छा संदेश पाठवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे आपले कर्तव्य असते, कधी मित्र तर कधी सल्लागार, मस्ती असो वा गंभीर काळ अगदी दिलखुल्लासपणे राजू भाऊ   नेहमी आमच्या सोबत असतात.  वाढदिवस एका दिलदार मनाचा, वाढदिवस एका दिलखुलास व्यक्तिमत्वाचा, "वाढदिवस आमच्या आयुष्यातील आदरणीय व्यक्तीचा, माजी नगरसेवक, नगर सेवा स्वच्छता समितीचे सदस्य, माजी शहरप्रमुख या व्यक्तिरेखा साकारलेल्या व्यक्तिमत्वाचा"  व्हॉइस ऑफ डिजिटल मिडीयाचे उपाध्यक्ष राजुभाऊ तुराणकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎈🎈🌹🎂🎂🌹 शुभेच्छुक:--- नगर सेवा स्वच्छता समिती वणी

वाहतूक पोलिसांनी शहरात हेल्मेट घालून काढली मोटरसायकल रॅली, रॅलीत अनेकांनी दर्शविला सहभाग

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  मोटारसायकलचे अपघात प्रचंड वाढल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून मोटारसायकलस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे अति आवश्यक झाले आहे. मोटरसायकलने कुठेही जायचे झाल्यास हेल्मेट घालणे सुरक्षेच्या दृष्टीने जरुरी असून हेल्मेटमुळे अपघातात आपला बचाव होऊ शकतो. हेल्मेट वापराबाबत दुचाकीस्वारांमध्ये जनजागृती करण्याकरिता आज २३ मार्चला सकाळी १० वाजता वाहतूक पोलिसांनी  हेल्मेट घालून शहरातून मोटरसायकल रॅली काढली. वणी वाहतूक शाखेच्या वतीने काढण्यात आलेल्या या रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधले. हेल्मेट घालून काढण्यात आलेल्या या मोटरसायकल रॅलीत वाहतूक पोलिसांबरोबरच पत्रकार, विद्यार्थी व जागरूक नागरिकही सहभागी झाले होते. शासकीय मैदानावरून या रॅलीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करीत ही रॅली वणी वाहतूक शाखा येथे पोहचल्यानंतर या रॅलीचा समारोप झाला. वाहतूक नियंत्रण उपशाखा वाणीचे पोलिस उपनिरीक्षक संजय आत्राम यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या रॅलीला एसडीपीओ संजय पुज्जलवार यांनी हिरवी झंडी दाखविली.   शहर व तालुक्यात मोटरसायकल अपघातांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ...

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, एक ठार तर एक जन गंभीर जखमी

Image
  प्रशांत चंदनखेडे वणी मालवाहू हायवा टीप्परची दुचाकीला जोरदार बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार तर एकाला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना आज 23 मार्चला दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास वणी नांदेपेरा रोडवरील सहारा पार्क जवळ घडली. धीरज आत्राम (२८) असे या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर संदीप सिडाम (३०) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे   त्याला आधी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला चंद्रपूरला रेफर करण्यास सांगितले. हे दोघेही जन वणी तालुक्यातील वांजरी गावातील रहिवासी असून ते काही कामानिमित्त वणीला येत असताना हा अपघात झाला. विट भट्यावर विट निर्मिती करीता लागणाऱ्या मातीची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने (MH 29 BE 1816) दुचाकीला समोरासमोर धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, दुचाकी पूर्णतः चेंदामेंदा झाली. दुचाकीवरील धीरज आत्राम या विवाहित युवकाचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. तर संदीप सिडाम या अविवाहित तरुणाला जबर मार लागल्याने त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. त्याची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. धीरज...

देशी दारू दुकानात झालेल्या वादात एकाचा मृत्यू, जेवणाचा डब्बा डोक्यावर मारल्याचा व्यक्त केला जात आहे संशय

Image
प्रशांत चंदनखेडे वणी एका देशी दारू दुकानात दोघांमध्ये झालेला वाद विकोपाला जाऊन एकाने दुसऱ्याच्या डोक्यावर जेवणाचा डब्बा मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वणी कोरपना मार्गावरील आबई फाटा येथे आज 23 मार्चला दुपारच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतक व संशयित मारेकरी दोघेही वेळाबाई या गावातील रहिवासी असल्याचे समजते. देशी दारू दुकानात मद्य सेवन केल्यानंतर दोघांमध्ये अनामिक कारणावरून वाद उफाळून आला. वादातून वाद वाढला व रागाच्या भरात एकाने जेवणाचा डब्बा दुसऱ्याच्या डोक्यावर मारला. मार वर्मी लागल्याने 55 वर्षीय इसम हा जागीच गतप्राण झाल्याची माहिती परिसरातून मिळाली आहे. सूर्यभान कुंभरे वय अंदाजे 55 वर्ष असे मृतकाचे नाव आहे. तर गावातीलच व्यक्तीने त्याच्या डोक्यावर जेवणाचा डब्बा मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्या संशयिताला शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे   मृतक व त्याच्यावर वार केल्याचा संशय असलेला इसम हे दोघेही वेळाबाई येथिल रहिवासी आहेत. दोघांचाही काही अनामिक कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला जाऊन दोघांमध्ये हाणामारी झाली. या झटापटीत गावातीलच त...

वणीला परत येत असलेल्या डॉक्टर दाम्पत्याच्या कारला भिषण अपघात, डॉक्टर पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

Image
  प्रशांत चंदनखेडे वणी वणी वरोरा मार्गावरील शेंबड गावाजवळ ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात डॉक्टर दाम्पत्याचा करुन अंत झाला. ही घटना आज 22 मार्चला दुपारच्या सुमारास घडली. वणी ग्रामीण रुग्णालयात नव्यानेच रुजू झालेल्या महिला डॉक्टर व वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या त्यांच्या पतीचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. कामानिमित्त बाहेरगावी गेलेले हे डॉक्टर दाम्पत्य वणीला परत येत असताना त्यांच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली. या भिषण अपघात डॉ. अश्विनी (झाडे) गौरकर (३१) रा. नांदेपेरा रोड यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती अतुल गौरकार यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. आरोग्य सेवेतील  तज्ञ डॉक्टरांचा गुढी पाडव्याच्या दिवशी असा हा अपघाती मृत्यू झाल्याने समाजमन हेलावलं आहे.  शहरात आज एका सुशिक्षित महिलेने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत असतानाच एका महिला डॉक्टर तिच्या डॉक्टर पतीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने शहरात आज दुःखाची लाट पसरली आहे. वणी ग्रामीण रुग्णालयात नव्यानेच रुजू झालेल्या महिला डॉक्टर...

वणी शहर व तालुक्यात आत्महत्यांचं सत्र थांबता थांबेना, आज एका महिलेने घेतला जगाचा निरोप

Image
प्रशांत चंदनखेडे वणी शहरात आत्महत्यांचं सत्र सुरूच असून आत्महत्यांच्या घटना थांबता थांबत नसल्याने आप्तस्वकीयांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. जिवन नकोसे झाल्यागत नागरिक आत्महत्या करू लागल्याने हा आता एक चिंतेचा विषय बनला आहे. सतत होणाऱ्या आत्मात्यांनी तालुका हादरला आहे. एकाची चीता विझत नाही तोवर दुसऱ्याचं सरण रचावं लागत असल्याने आता चिंता व्यक्त केली जात आहे. या सतत होणाऱ्या आत्महत्या रोखण्याकरिता शासकीय व प्रशासकीय स्तरावर प्रयत्न होनं आता गरजेचं झालं आहे. नागरिकांमध्ये जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा याकरिता शासन, प्रशासनाकडून संमुपदेशन होनं गरजेचं झालं आहे. नागरिकांमध्ये जगण्याची ओढ निर्माण होईल याकरिता मेळाव्यांमधून मार्गदर्शन करणं आवश्यक झालं आहे. आज गुढी पाडव्याचा सन सर्वत्र साजरा होत असताना एका समृद्ध जिवन जगणाऱ्या महिलेने राहत्या घरी पंख्याला गळफास लावून जीवनाचा शेवट केला. आज 22 मार्चला सकाळी ही घटना उघडकीस आली. ही महिला घरी एकटीच राहायची. पतीचे गंभीर आजाराने दोन वर्षांपूर्वी निधन झाले. तर  मुलगी अभियंता म्हणून बाहेरगावी नोकरीला आहे. ती देखिल एका इंग्रजी मध्य...