बहुजन मुक्ती पार्टीचे पांढरकवडा येथे जिल्हास्तरीय अधिवेशन, ठरणार आंदोलनाची दिशा

Latest News

Latest News

योगेश मडावी झरी 

ओबीसी व मराठा आरक्षणातून जातीजातीत भांडणे, शेतकर्‍यांची आत्महत्या, लोकशाहीची पिछेहाट, शासक जातीचे फोडा आणि राज्य करा आदी गंभीर विषयांवर विचारमंथन आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बहूजन शासक बनो मिशन २०२४ महाराष्ट्र राज्य अधिवेशन तयारी अंतर्गत रविवार, १५ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ ते ५ या वेळेत जिल्हयातील पांढरकवडा येथील नगर परिषद बचत भवनात बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हास्तरीय अधिवेशन ठेवण्यात आले आहे.

या अधिवेशनाचे उद्घाटन आर्णीचे सामाजीक कार्यकर्ता गजानन बुटले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बीएमपीच्या राष्ट्रीय महासचिेव सारीका भगत, युवा बीएमपीच्या राज्य उपाध्यक्ष आकाश कोवे, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. रविकांत कावडे, सामाजीक कार्यकर्ता जिया अहेमद, राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. अनिल किनाके, राज्य सोशल प्रभारी रुचिरा कानिंदे, महिला जिल्हाध्यक्षा ज्योती शामकुवर, आनंदराव पनासे यांची उपस्थिती राहील. हा कार्यक्रम युवा आघाडीचे राष्ट्रीय सचिव सौरभ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या वेळी जिल्ह्यातील अनेक मान्यवर मंडळी तसेच बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. भारतात लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर देशातील निवडणूका निपक्ष झाल्या पाहिजेत, शेती व शेतकरी विरोधी धोरणामुळे आज शेतकर्‍यांच्या हजारो समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे लाखो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा आणि ओबीसी यांच्यात अविश्वासाचे वातावरण निर्माण करुन दोन्ही समाजात जातीय तेढ निर्माण करुन भांडणे लावणे हा शासक जातीचा फोडा आणि राज्य करा या धोरणाचा परिणाम आहे. अशा अनेक ज्वलंत विषयांवर जनजागृती, राज्य अधिवेशनाचा आढावा व आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जिल्हास्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. बहुजन समाजातील नागरिकांनी विचारवंतांनी या जिल्हास्तरीय अधिवेशनामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक भोयर यांनी केले आहे.

Post Comments

No comments:

Powered by Blogger.