नैराश्येतून आणखी एका तरुणाने केला जीवनाचा शेवट

प्रशांत चंदनखेडे वणी 

तालुक्यातील निवली (सुंदरनगर) या गावातील तरुणाने शेत शिवारातील झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना आज ८ फेब्रुवारीला सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. शुभम अरविंद खिरटकर (२५) असे या गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मालवाहू वाहन चालवायचा. त्याने नैराश्येतून आत्महत्या केल्याचे बोलल्या जात आहे. 

निवली (सुंदरनगर) येथे परिवारासह वास्तव्यास आलेला शुभम हा ७ फेब्रुवारीला रात्री १० वाजता घराबाहेर पडला तो घरी परतलाच नाही. आज ८ फेब्रुवारीला गावालगतच असलेल्या शेतात त्याचे वडील सकाळी बैलांना पाहण्याकरिता गेले असता त्यांना शुभमची दुचाकी शेताजवळ उभी दिसली. त्यामुळे मुलगा शेतात असावा म्हणून वडिलांनी शेतात त्याचा शोध घेणे सुरु केले. मुलाचा शोध घेत असतांनाच अचानक त्यांना शेताच्या धुऱ्यावरील एका झाडाला शुभम गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मुलाने गळफास घेतल्याचे पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला. त्यांचा जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकून आसपासचे लोक घटनास्थळाकडे धावून आले. त्यापैकी काहींनी शिरपूर पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. शिरपूर पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. कुटुंबाचा आधार असलेल्या तरुणाने असा हा आत्महत्येचा मार्ग निवडल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या अशा या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला हे अद्याप गुलदस्त्यात आहे. घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी