शिरपूर पोलिसांनी रोखली गोवंश जनावरांची तस्करी, ८ गोवंश जनावरांची केली सुटका


प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी तालुक्यातील सैदाबाद शेत शिवारातून गोवंश जनावरांची होणारी तस्करी शिरपूर पोलिसांनी रोखली. गोवंश जनावरांना मालवाहू वाहनात निर्दयीपणे कोंबून त्यांना कत्तलीकरिता घेऊन जाणाऱ्या दोन आरोपींना शिरपूर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या तावडीतून ८ गोवंश जनावरांची सुटका केली आहे. ही कार्यवाही ५ एप्रिलला सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. वणी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची तस्करी केली जाते.  कत्तलीकरिता जनावरे घेऊन जातांना तस्करांकडून विविध शक्कली लढविल्या जातात. सैदाबाद शेत शिवारातून मालवाहू पिकअप वाहनातून बैलांना कत्तली करीता घेऊन जाण्याच्या तयारीत असलेल्या तस्करांना शिरपूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. तसेच त्यांच्या जवळून ४ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 

सैदाबाद शेत शिवारात एका मालवाहू पिकअप वाहनात गोवंश जनावरांना निर्दयीपणे कोंबून त्यांना कत्तली करीता नेण्यात येत असल्याची गोपनीय माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. त्या ठिकाणी पोलिसांना एक मालवाहू पिकअप वाहन उभे दिसले. त्या वाहनाची तपासणी केली असता त्यात लोखंडी अँगलला दोराने बांधून असलेले आठ बैल आढळून आले. अतिशय निर्दयीपणे या बैलांना वाहनात कोंबण्यात आले होते. वाहन चालकाकडे गोवंश जनावरांच्या वाहतुकीबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे मालवाहू वाहनातून गोवंश जनावरांची तस्करी केली जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी गोवंश जनावरांची तस्करी करणाऱ्या बालाजी हरिदास मोहितकर (४४) व गौरव बालाजी मोहितकर (२३) दोघेही रा. राईकोट, ता. झरीजामणी या दोघांना अटक करून त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५, १९६० व १९५१ च्या विविध कलमांप्रमाणे गुन्हे दाखल केले आहे. त्यांच्या तावडीतून ८ बैलांची सुटका करण्यात आली आहे. या कार्यवाहीत पोलिसांनी एक पिकअप वाहन (MH २९ BE ६८१२), एक मोटारसायकल (MH २९ कंद ४३) व ८ गोवंश जनावरे असा एकूण ४ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही धडक कार्यवाही ठाणेदार माधव शिंदे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय रावसाहेब बुधवंत यांनी केली. घटनेचा पुढील तपास एएसआय प्रविण गायकवाड, नापोका अनिल सुरपाम करीत आहे. 
 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी