मनसेने उचलला उपचाराचा खर्च, आणि अत्यवस्थ अवस्थेतील आदित्य झाला ठणठणीत बरा


प्रशांत चंदनखेडे वणी 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी उपचाराचा खर्च उचलल्याने अत्यवस्थ अवस्थेतील आणखी एक रुग्ण ठणठणीत बरा झाला आहे. एका अपघातग्रस्त तरुणासाठी राजू उंबरकर हे एकप्रकारे देवदूत ठरले आहेत. चिंताजनक अवस्थेत असलेल्या तरुणाला त्यांच्या मदतीमुळे योग्य उपचार मिळाले. अपघातात गंभीर जखमी झाल्यांनतर जीवन मृत्यूशी संघर्ष करणाऱ्या शहरातील एका तरुणाला राजू उंबरकर यांच्या मदतीमुळे नवजीवन मिळालं आहे. रामपुरा येथील रहिवाशी असलेला आदित्य देठे हा १९ वर्षीय तरुण दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मेंदूला इजा होऊन मेंदू कायम स्वरूपी निकामी होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली होती. तरुणाच्या घरची परिस्थिती अगदीच बेताची. त्याच्या उपचाराचा खर्च उचलणं कुटुंबियांसाठी अशक्यप्राय होतं. मुलाची जीवन मृत्यूशी सुरु असलेली झुंज पाहून आई वडिलांचं काळीज फाटत होतं. उपचाराअभावी मुलावर दुदैवी प्रसंग ओढवू नये, या विवंचनेत कुटुंबीय असतांनाच रामपुरा येथील रहिवाशांनी राजू उंबरकर यांच्याकडे धाव घेतली. त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली. मदतीसाठी नेहमीच एक पाऊल पुढे असणाऱ्या राजू उंबरकर यांनी क्षणभरही विचार न करता तरुणाच्या उपचाराचा पूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी उपचाराचा खर्च उचलल्याने तरुणाला योग्य उपचार मिळाला, व अत्यवस्थ असलेला तरुण ठणठणीत बरा झाला. रुग्णांच्या उपचारासाठी राजू उंबरकर यांच्या हातून नेहमीच मदतीचा ओघ वाहिला आहे. त्यांनी उपचाराच्या उचललेल्या खर्चामुळे कित्येक रुग्णांचे जीव वाचले आहेत. शिक्षणात व उपचारात आर्थिक परिस्थितीमुळे बाधा येऊ नये म्हणून राजू उंबरकर यांनी विद्यार्थी व रुग्णांना नेहमीच आधार दिला आहे. कठीण समयी ते नेहमी मदतीला धावत असल्याने संकटात आधार देणारा हक्काचा माणूस आपल्या पाठीशी असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होऊ लागली आहे.

शहरातील रामपुरा येथे कुटुंबासह राहत असलेल्या आदित्य देठे या तरुणाचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने मेंदूला इजा झाली होती. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असतांना डॉक्टरांनी त्याचा मेंदू निकामी होण्याची व त्याला कायमस्वरूपी अपंगत्व येण्याची शक्यता वर्तविली होती. त्याच्यावर त्वरित शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शस्त्रक्रियेला लाखो रुपयांचा खर्च येणार होता. प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणारं हे कुटुंबं उपचाराचा एवढा खर्च उचलू शकत नव्हतं. उपचाराअभावी पोटच्या गोळ्यावर दुर्दैवी प्रसंग ओढवू नये, ही विवंचना कुटुंबाला लागली होती. मुलाची जीवन मृत्यूशी झुंज सुरु होती. तर मुलाची अवस्था पाहून आई वडिलांचं काळीज फाटत होतं. अशातच रामपूरा येथील नागरिकांनी नेहमी मदतीला धावणाऱ्या राजू उंबरकर यांची भेट घेतली. त्यांनी राजू उंबरकर यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली. राजू उंबरकर यांनी क्षणभरही विचार न करता तरुणाच्या उपचाराचा पूर्ण खर्च उचलण्याची तयारी दर्शविली. त्यांनी रुग्णालयाशी संपर्क साधत उपचाराला लागणाऱ्या खर्चाचीही पूर्तता केली. राजू उंबरकर यांनी उपचाराचा पूर्ण खर्च उचलल्याने तरुणाला योग्य उपचार मिळाले, व अत्यवस्थ अवस्थेत असलेला तरुण ठणठणीत बरा झाला. राजू उंबरकर यांच्या मदतीमुळे आदित्य हा गंभीर अवस्थेतून सुखरूप परतल्याने कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरंगले तर उद्याचे भविष्य असलेला तरुण ठणठणीत बरा झाल्याने राजू उंबरकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. राजू उंबरकर यांच्या मदतीमुळे एका अपघातग्रस्त तरुणाला नवजीवन मिळाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी