प्रशांत चंदनखेडे वणी प्रवासी रेल्वेने कटून एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि. ५ मे ला दुपारी ११ ते ११.३० वाजताच्या सुमारास वणी रेल्वे स्टेशन जवळ घडली. तरुणीने रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रश्मी धनराज पराते (२०) रा. शास्त्रीनगर असे या मृत तरुणीचे नाव आहे. ही तरुणी अनेक दिवसांपासून आजारी असल्याचे सांगण्यात येते. तिच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आल्याचेही आई वडिलांचे म्हणणे आहे. नुकताच तिच्यावर नागपूर येथील एम्स रुग्णालयात उपचार करून तिला घरी आणले होते. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तिला कुठलाही गंभीर आजार नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत होते, असे तिच्या आई वडिलांचे म्हणणे आहे. मात्र ती अतिशय अशक्त होती. ती २० वर्ष वयाची असतांनाही तिचे वजन अवघे २० ते २१ किलो होते. त्यामुळे ती मानसिक तणावात राहायची. अशातच आज तिने बल्लारशा मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस खाली येऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मृतक रश्मीच्या वडिलांचे टी-स्टाल असून तिला एक बहीण देखील आहे. आज बहिणीचा पेपर असतांना तिच्...
Comments
Post a Comment