Latest News

Latest News
Loading...

पोटगीसाठी पती विरुद्ध भरला खटला आणि पहिल्या पती पासून घटस्फोट न घेता दुसऱ्याशी संसार थाटला

प्रशांत चंदनखेडे वणी 

कौटुंबिक हिंचाराला महिलांनाच सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी नेहमी ऐकायला मिळतात. शाररिरीक व मानसिक छळ नेहमी महिलांचाच होतो, अशाही तक्रारी प्रचंड आहेत. सासरी महिलांवर अत्याचार होत असल्याच्या ढीगभर तक्रारी पोलीस स्टेशनला दाखल आहेत. मात्र महिलेच्या अत्याचाराला पुरुष बळी पडल्याच्या तक्रारी क्वचितच दाखल होतात. अशीच एक पती पत्नीच्या मानसिक त्रासाने त्रस्त झाल्याची घटना समोर आली आहे. पत्नीच्या कारनाम्यांनी त्रस्त झालेल्या एका पतीने पत्नी व तिच्या कुटुंबीयांविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. पत्नीच्या त्रासाला वैतागलेल्या एका पतीवर आपल्या पत्नी विरुद्ध तक्रार दाखल करण्याची वेळ आली आहे. पत्नीने शारीरिक व मानसिक त्रास देतांनाच दुसरा विवाह करून पतीची फसगत केली. तसेच दुसऱ्या विवाहाचा पुरावा मिळविण्यासाठी गेलेल्या पतीच्या भावाला तिच्या कुटुंबीयांनी मारहाण केली. याबाबत पती विजय आसुटकर याने २३ मे ला पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवल्याने पोलिसांनी पत्नी व सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे.

राळेगाव तालुक्यातील खैरी या गावचा रहिवाशी आलेल्या विजय रामदास आसुटकर (३५) याचा मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील विठ्ठल पायघन यांच्या मुलीशी २१ एप्रिल २०२२ रोजी रीतीरिवाजाप्रमाणे विवाह झाला. लग्न झाल्यानंतर त्यांची मुलगी केवळ १० महिने पती जवळ नांदल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नंतर ती काहीही कारण नसतांना आपल्या माहेरी निघून गेली. ती ४ महिने माहेरी राहिल्यानंतर पती व पत्नीने त्यांच्या विवाहात मध्यस्थी असलेल्या मारोती धांडे यांच्या समक्ष ३१ ऑगष्ट २०२३ रोजी १०० रुपयांच्या मुद्रांकावर घडस्फोटाचा करारनामा लिहून घेतला. तेंव्हापासून हे दोघेही पती पत्नी एकमेकांपासून विभक्त राहू लागले. 

मात्र काही दिवसानंतर पत्नीने घुमजाव केले. तिने आपल्या पती विरुद्ध मारेगाव प्रथम श्रेणी न्यायालयात पोटगीसाठी याचिका दाखल केली. न्यायालयाने तिची पोटगीसाठीची याचिका मंजूर करून तिला अंतरिम २००० रुपये पोटगी देण्याचा आदेशही दिला. पत्नीने ३१ ऑगष्ट २०२२ ला केलेला घटस्फोटाचा करारनामा खोटा ठरवून पती विजय आसुटकर व त्याच्या कुटुंबियांविरुद्ध खोट्या केसेस दाखल केल्या, व ती त्यांना सातत्याने शारीरिक व मानसिक त्रास देत आहे.

विजय आसुटकर याची पत्नी असल्याचे सांगून तिने कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार पती व त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध खोट्या केसेस दाखल केल्या. आणि पहिल्या पती पासून कायदेशीर सोडचिट्ठी घेण्याआधीच १९ मे २०२५ रोजी तिने दुसरा विवाह केला. तसेच तिच्या विवाहाचा पुरावा मिळविण्यासाठी तेथे गेलेल्या विजय आसुटकर याच्या भावालाही तिच्या कुटुंबीयांनी मारहाण केली. पहिल्या पती पासून घटस्फोट घेण्याआधीच पत्नीने दुसरा विवाह केला, हा एकप्रकारे गुन्हा आहे.

एकीकडे विजय आसुटकरची पत्नी असल्याचा दावा करीत ती न्यायालयात खटला लढवीत आहे. तर दुसरीकडे विजय याच्या पासून घटस्फोट घेतल्याचे सांगून तिने चक्क दुसरा विवाह केला आहे. त्यातल्या त्यात विजयचा भाऊ राजू आसुटकर तिच्या दुसऱ्या विवाहाचा पुरावा मिळविण्याकरिता गेला असता त्याला तिच्या कुटुंबीयांनी जबर मारहाणही केली. त्यामुळे पत्नी व तिचं कुटुंबं न्यायालयात खोटी याचिका दाखल करून विजय व त्याच्या कुटुंबीयांचा मानसिक छळ करीत असल्याची तक्रार विजय आसुटकर याने मारेगाव पोलीस स्टेशनला नोंदविली. 

विजय आसुटकर याच्या तक्रारी वरून पोलिसांनी त्याच्या भावाला झालेली मारहाण व पत्नीने दुसरा विवाह केल्याबाबत पौर्णिमा विजय आसुटकर (३५), विठ्ठल दादाजी पायघन (६०), नत्थू दादाजी पायघन (५५), चंद्रकला विठ्ठल पायघन (५५), मारोती धांडे (६०) सर्व रा. पहापळ ता. मारेगाव यांच्यावर बीएनएसच्या कलम ११५(२), ३(५), ३५१(२), ३५१(३), ३५२, ८२(१) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे. 



No comments:

Powered by Blogger.