Latest News

Latest News
Loading...

वाट माझी बघतो रिक्षावाला म्हणत ती ऑटोवाल्या सोबतच गेली पळून, तिचं जुळलं होतं लग्न पण ती प्रेमात होती मग्न

प्रशांत चंदनखेडे वणी 

मुलीसाठी योग्य स्थळ बघून कुटुंबीयांनी मुलीच्या लग्नाची सुपारी फोडली. मुलीचे लग्न जुळल्याने कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. कुटुंबं लग्नाच्या तयारीला लागलं होतं. मुलीचं लग्न धुमधडाक्यात करण्याची इच्छा बाळगून असलेल्या आई वडिलांनी लग्न सोहळ्याची जय्यत तयारी केली. लग्नाच्या पत्रिका छापल्या आणि नातेवाईकांना मुलीच्या लग्नाचे स्नेह निमंत्रण देण्यात आले. घरात लग्नाची धामधूम सुरु होती. लग्न घटका अवघ्या काही दिवसांवरच आलेली असतांना मुलीने आई वडिलांचा मानसन्मान पायदळी तुडवीत तोंडाला काळं फासलं. कुटुंबं लग्नाच्या तयारीत व्यस्त होतं. आणि मुलगी प्रेमाच्या दुनियेत मस्त होती. तिने आई वडिलांच्या इज्जतीचा जराही विचार न करता प्रियकरासोबत पळ काढला. लग्नाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच ती प्रियकराचा हात धरून पळून गेली. उपवधू पळून गेल्याची चर्चा नंतर पंचक्रोशीत रंगली. नातेवाईकांपर्यंतही ही बातमी पोहचली. त्यामुळे कुटुंबावर प्रचंड नामुष्की ओढावली. बाशिंग बांधून असलेल्या नवऱ्या मुलाला ही बातमी कळताच त्याच्या आनंदाचा पार ढोलच फाटला. नंतर पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आली. आता पोलिसांबरोबरच मुलीचं कुटुंबं व नवरा मुलगाही तिचा ठिकठिकाणी शोध घेत आहे. 

शहरापासून काही अंतरावर बहुरंगी लोकांची वस्ती असलेलं एक गाव आहे. या गावात वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबातील मुलीचं लग्न शहरालगत असलेल्या एका गावातील मुलाशी जुळलं. मुलांची लग्न जुळल्याने दोन कुटुंबं एकमेकांशी जुळणार असल्याने दोन्ही कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. दोन्ही कुटुंबीयांची लग्नाची तयारीही पूर्ण झाली होती. नातेवाईकांनाही लग्नाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. अंदाजे ५ जूनला लग्न सोहळा संपन्न होणार होता. मुलीचं लग्न धुमधडाक्यात करण्याकरिता कुटुंबं प्रचंड उत्साही होतं. पण मुलीच्या मनात वेगळंच काही तरी शिजत होतं. ती एका मजनूच्या प्रेमात वेडी झाली होती. त्याच्या ऑटोतुन ती नेहमी जाणं येणं करायची. शेवटी "वाट माझी बघतो रिक्षावाला" म्हणत ती त्याच्या सोबत फुर्रर्र झाली. चार दिवसाच्या प्रेमात ती जन्मदात्या आई वडिलांचं प्रेम विसरली. आणि लग्न तोंडावर असतांना ऑटोवाल्या तरुणासोबत पळून गेली. इकडे मुलींसाठी योग्य स्थळ शोधण्यात आई वडील जीवाचं रान करतात. आणि मुली सडकछाप मजनूंसोबत पळून जातांना जराही विचार करीत नाही. ही मुलींच्या बाबतीत मोठी शोकांतिका झाली आहे. 

मुली व महिलांचे पळून जाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मुली व महिलांमध्ये संयम राहिल्याचे दिसत नाही. महिला कधी कुणावर भाळतील याचा आता नेमच राहिलेला नाही. लग्न झालेल्या महिलाही पतीशी दगा फटका करून प्रियकरासोबत पळून गेल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. लेकरांची आई असलेली महिलाही भान विसरून आपली मर्यादा ओलांडताना दिसत आहे. शहरातीलच एका पंचक्रोशीतील मुलगी तिच्या लग्नासाठी स्थळ बघणे सुरु होताच प्रियकरासोबत पळून गेली. त्यामुळे मुली व महिलांबाबत आता कुटुंबियांना प्रचंड काळजी लागल्याचे दिसून येते. लग्न एकाशी व संसार दुसऱ्याशी थाटण्याचे प्रकारही सध्या प्रचंड वाढले आहेत. आई वडील मोठ्या प्रयत्नांनी लग्न जोडतात. आणि मुली आई वडिलांच्या अब्रूची राखरांगोळी करीत सडकछाप मजनूंसोबत पळून जातात. आधी मुलींच्या लग्नात हुंडा द्यावा लागायचा म्हणून आई वडील चिंतेत राहायचे. तर आता मुलगी इज्जत तर घालवणार नाही ना, याची आई वडिलांना चिंता लागलेली असते. 

No comments:

Powered by Blogger.