प्रशांत चंदनखेडे वणी
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून "एक पेड माँ के नाम" या केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत केशव नागरी पतसंस्थेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचे संतुलन राखण्याकरिता व प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्याकरिता वृक्षारोपण व वृक्षांचं संवर्धन करणं गरजेचं झालं आहे. नैसर्गिक वातावरण निर्मिती करीता जास्तीत जास्त वृक्ष लावण्याची गरज लक्षात घेऊन केशव नागरी सहकारी पतसंस्थेकडून शहर व शहरालगत मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात आली.
पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता झाडे लावणं व ती जगवणं अत्यंत गरजेचं झालं आहे. विकास कामांच्या नावावर मोठ्या प्रमाणात वृक्ष तोडली जातात. पण त्या प्रमाणात वृक्षांची लागवड केली जात नाही. वृक्षारोपण करण्याकडे दुर्लक्ष करून निसर्गाची हानी केली जात आहे. वृक्षारोपण व संवर्धनाची जबाबदारी घेतली जात नसल्याने पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. पर्यावरणाचं संतुलन टिकवून ठेवण्याकरिता वृक्षारोपण व त्यांचं संगोपन करणं काळाची गरज झाली आहे. आणि हीच गरज ओळखून केशव नागरी पतसंस्थेच्या वतीने वृक्षारोपणाचा हा महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.वृक्षारोपणाची जबाबदारी संस्थेचे उपाध्यक्ष दौलत वाघमारे, मानद सचिव अनिल आक्केवार, संचालक अरुण कावडकर, सतिश कुल्दीवार, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक दिकुंडवार, विशेष वसुली अधिकारी कवडु पिंपळकर, चार्टर्ड अकाउंटंट अनिल झाबक, शाखा व्यवस्थापक रविंद्र ठेगणे, सहाय्यक निबंधक तथा कार्यालयीन अधिकारी शैलेश मडावी, मनोज पिसाळकर, केशव नागरी पतसंस्थेचे मुकेश गुप्ता, प्रदीप कामडे, किरण डाहुले, विकास चौधरी, संजय कावडे, हार्दिक उरगुंडे, कु. रेणुका संगेवार, कु. किरण मडावी, कु. स्विटी खंडाळकर, किशोर घुगुल, ओम करनेवार यांनी पार पाडली.
No comments: