Latest News

Latest News
Loading...

डीएव्ही शाळेच्या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून करावा लागतो स्कुल बसने प्रवास


प्रशांत चंदनखेडे वणी 

वेकोलिच्या सुंदरनगर कॉलनी येथून डीएव्ही (DAV) शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता अपघाताला आमंत्रण देऊ लागला आहे. वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन या रस्त्याने वाहने चालवावी लागत आहे. हा रस्ता प्रचंड धोकादायक बनला असून स्कुल बस चालकही या रस्त्यावरून स्कुलबस चालवितांना घाबरत आहेत. या रस्त्याने स्कुल बस मधून विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणे अतिशय जिकरीचे झाले आहे. या रस्त्याने स्कुल बस चालवितांना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याने स्कुल बस चालविणे म्हणजे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालण्यासारखे झाले आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देऊनही या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे आता स्कुल बस चालक व मालकांनी या रस्त्याने स्कुल बस न चालविण्याचा निर्णय घेतला आहे.  
डीएव्ही शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्याने या रस्त्याने स्कुल बस चालविणे अतिशय धोकादायक झाले आहे. या रस्त्याने विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणे म्हणजे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालण्यासारखे झाले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात हा रस्ता अडथळे निर्माण करून लागला आहे. एका बाजूला अरुंद सिमेंट रस्ता व दुसऱ्या बाजूला प्रचंड खड्डे असे विदारक चित्र या रस्त्याचे झाले आहे. या रस्त्याने स्कुल बस कधी उलटेल याची शाश्वती राहिलेली नाही. चालकांना जीवावर उद्धार होऊन या रस्त्याने स्कुल बस चालवावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून स्कुल बस चालविणे चालकांसाठी कठीण झाल्याने स्कुल बस चालक व मालकांनी या रस्त्याने स्कुल बस न चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 

सुंदरनगर कॉलनी कडून डीएव्ही शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी व स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाकडे या रस्त्याच्या दुरुस्तीकरणाची मागणी केली आहे. हा रस्ता आघातास आमंत्रण देऊ लागला आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेच्या प्रवासात या रस्त्यामुळे अडथळे निर्माण झालेले असतांनाही प्रशासन या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यायला तयार नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देणेही प्रशासनाला गरजेचे वाटत नाही. 

अतिशय जोखीम पत्करून या रस्त्याने विद्यार्थ्यांना शाळेत न्यावे लागत असल्याने स्कुल बस चालक व मालकांनी विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालणारा हा प्रवास थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित शाळेत पोहचविणं ही स्कुल बस चालकांची जबाबदारी आहे. पण प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे रस्त्याची झालेली अवस्था बघता या रस्त्याने प्रवास करणे म्हणजे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. आणि म्हणूनच वणी वरून स्कुल बसचा प्रवास थांबविण्याचा निर्णय चालक व मालकांनी घेतला आहे. तसे पत्रही त्यांनी शाळेला दिले आहे. 

 

No comments:

Powered by Blogger.