प्रशांत चंदनखेडे वणी
रिपब्लिकन नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्म शताब्दी वर्षाचे औचित्य साधून आंबेडकरी जन आंदोलन आंदोलन समिती व समता संगर प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने १३ जूनला सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत स्थानिक खंडोबा वाघोबा देवस्थान सभागृहात प्रकाशन सोहळा व चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. "संग्रामयुग" कविता संग्रह तथा वणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना "भ्रम आणि वास्तव" या पुस्तकाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच चर्चासत्रातून आजची वास्तविक परिस्थिती डोळ्यासमोर यावी, या प्रामाणिक उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम दोन सत्रात पार पडणार आहे. पाहिलं सत्र सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत चालणार आहे. या सत्रात कविता संग्रह व पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा निवृत्त प्रा. घनश्याम धाबर्डे हे राहतील. तर जेष्ठ विधिज्ञ ऍड. मनोहर पाटील (वरोरा) यांच्या हस्ते कविता संग्रह व पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रा. प्रकाश राठोड (नागपूर) व प्रेसनजीत गायकवाड (नागपूर) हे प्रमुख भाष्यकार म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल तेलंग हे करतील. संचालन कवि विजय भगत तर आभार प्रदर्शन अशोक उईके हे करतील.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात दुपारी ३ ते सायं.६ वाजेपर्यंत चर्चासत्र चालणार आहे. वर्तमान औद्योगीकरणात दलित, आदिवासी, ओबीसी, बौद्ध व अल्पसंख्यांक समूहातील भूमिहीनांचे प्रश्न व उपाय या विषयावर हे चर्चासत्र रंगणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड. मनोहर पाटील हे राहतील. तर प्रमुख वक्ते म्हणून मनोहर नाईक (नागपूर) व अनिल तेलंग यांची उपस्थिती राहणार आहे. प्रमुख वक्त्यांचे मौलिक विचार या चर्चा सत्रातून ऐकायला मिळणार आहे. तेंव्हा या कार्यक्रमाला अभ्यासक, वाचक व हितचिंतक म्हणून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन आंबेडकरी जन आंदोलन समिती वणीच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments: