प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील महात्मा फुले चौक वार्ड क्रमांक २२ येथे पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली असून अनियमित व अवेळी होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या महिला थेट नगर पालिकेवर धडकल्या. या वार्डात कधी नळांना पाणीच येत नाही तर कधी रात्री उशिरा नळ येतात. त्यामुळे येथील रहिवाशांना नेहमीच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. नगर पालिकेकडून होणाऱ्या अनियमित पाणी पुरवठ्यामुळे येथे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली असून येथील नागरिकांना स्वखर्चाने पाण्याचे टँकर बोलवावे लागत आहे. पाणीकर भरूनही पाणी विकत घेण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. त्यामुळे स्वखर्चाने पाण्याचे टँकर बोलावून आर्थिक भुर्दंड सोसणाऱ्या महिलांनी थेट नगर पालिकेवर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. वार्ड क्रमांक २२ मधील पाण्याची समस्या कायम दूर करण्याकरिता येथे ट्यूबवेलची व्यवस्था करून देण्याची मागणी या महिलांनी नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शहरातील काही भागात भीषण पाणी समस्या निर्माण झाली आहे. येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी टंचाईला तोंड देतांना येथील नागरिक कमालीचे वैतागले आहेत. पाण्याचे भरपूर स्रोत उपलब्ध असतांना नगर पालिकेच्या नियोजनाअभावी शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना नाहक पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहरवासियांमधून कमालीचा संताप व्यक्त होऊ लागला आहे. अनियमित व अवेळी होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे शहरात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. शहरातील काही भागात रात्री उशिरा नळ सोडले जाते. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना रात्र काळी करावी लागते. त्यातही कुठे कुठे नळांना पाणीच येत नाही. त्यामुळे रात्रभर जागूनही पाणी मिळत नसल्याने नगर पालिकेविषयी नागरिकांमधून कमालीचा रोष व्यक्त होत आहे.
पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या शहरातील काही भागांमध्ये वार्ड क्रमांक २२ हा देखील एक भाग आहे. येथील रहिवाशांना दरवर्षीच पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. अनियमित व कमी दाबाच्या पाणी पुरवठ्याचा मोठा फटका या वार्डाला बसला आहे. कधी नळांना पाणीच येत नाही तर कधी रात्री बेरात्री नळ येतात. ही या वार्डाची नेहमीचीच समस्या झाली आहे. त्यामुळे पाणी टंचाईचा सामना करतांना संतप्त झालेल्या महिलांनी थेट नगर पालिकेवरच मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. वार्ड क्रमांक २२ मधील पाण्याच्या समस्येवर कायम तोडगा काढण्याकरिता येथे ट्यूबवेलची व्यवस्था करून देण्याची मागणी येथील महिलांनी न.प. मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदन देतांना प्रिया काटकर, प्रतिता ठमके, आजिदा शेख, हिरा काटकर, प्रीती मोडक, मंदा मोडक, कमल मोडक, अंजु बांगडे, कविता राजगडकर, तारा मोडक, दीपा घोस, नलिनी मोडक, स्वाती मोडक, रेखा धनकसर, बेबी कावडे, कांता सातपुते यांच्यासह वार्डातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
No comments: