प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी घुग्गुस मार्गावरील जन्नत सिलेब्रेशन हॉल जवळ झालेल्या भीषण कार दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पाच वर्षीय चिमुकलीवर नागपूर येथे शर्थीचे उपचार सुरु होते. मात्र ३१ ऑक्टोबरला रात्री उशिरा तिचा ब्रेन डेड झाल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या चिमुकलीची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर संपली. इनाथा शारीख शेख या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कार अपघातातील मृतांची संख्या आता पाच झाली आहे.
शुक्रवार ३१ ऑक्टोबरला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास जन्नत हॉलपासून काही अंतरावर वणीकडे येणारी कार अनियंत्रित होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मात्र कारमधील पाच वर्षाची चिमुकली या अपघातात गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर नागपूर येथे उपचार सुरु होते. परंतु ३१ ऑक्टोबरलाच रात्री उशिरा या चिमुकलीचा ब्रेन डेड झाल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या चिमुकलीची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. इनाथा शेख या चिमुकलीचा उचारदरम्यान मृत्यू झाल्याने या अपघातातील मृतांची संख्या आता पाच झाली आहे.
शहरातील भीमनगर येथे वास्तव्यास असलेले रियाजुद्दीन शेख (५२) यांची मुलगी कार चालविणे शिकत असतांना तिचे कारवरील नियंत्रण सुटले व हा अपघात घडला. या भीषण अपघातात कार शिकणारी माएरा रियाजुद्दीन शेख (१७) हिच्यासह तिच्या दोन बहिणी जोया (१२) व अनिबा (१०) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर वडील रियाजुद्दीन शेख यांना रुग्णालयात हलविल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. घुग्गुस मार्गाने वणीकडे कार चालवत येणाऱ्या माएरा हिचे कारवरील नियंत्रण सुटले व कार दुभाजकावरून उसळून महामार्गाच्या दुसऱ्या लेनवर आदळली. दरम्यान घुग्गुसकडे जाणाऱ्या ट्रकची कारला जोरदार धडक बसली. यात माएरासह तिच्या दोन बहिणी जागीच ठार झाल्या. तर वडिल रियाजुद्दीन उर्फ रियाज मिस्त्री यांचा रुग्णालयात हलविल्यानंतर मृत्यू झाला. या बापलेकींवर काल रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यावर अंत्यविधी होत असतांना सर्वांचेच डोळे पाणावले होते.
मात्र या अपघातात गंभीर जखमी झालेली रियाजुद्दीन यांच्या भावाची मुलगी इनाथा शेख हिच्यावर नागपूर येथे शर्थीचे उपचार सुरु होते. परंतु तिनेही ३१ ऑक्टोबरला रात्री उशिरा शेवटचा श्वास घेतला. कारमधील पाचही जणांचा या अपघातात करून अंत झाला. शेख कुटुंबातील पाचही जण अपघातात मृत्युमुखी पडल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेने अख्ख शहर हादरलं आहे. मार्गात दबा धरून बसलेल्या मृत्यूने आपला डाव साधला आणि एक हसतं खेळतं कुटुंबं उद्धवस्त झालं. एका कुटुंबातील चार जण काळाने हिरावून घेतले. तर दुसऱ्या कुटुंबातील एका चिमुकलीवर काळाने घाला घातला. या व्ह्रदयद्रावक घटनेने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे.

No comments: