Posts

Showing posts from July, 2024

फिरायला जातो म्हणून घराबाहेर पडलेली मुलगी बेपत्ता, फूस लावून पळवून नेल्याचा संशय

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  शहरालगत असलेल्या एका गावात वास्तव्यास असलेली अल्पवयीन मुलगी घरून बेपत्ता झाल्याची घटना २९ जुलैला उघडकीस आली. फिरायला जातो म्हणून घराबाहेर पडलेली मुलगी घरी परतलीच नाही. उशिरापर्यंत मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरु केली. तिचा सर्वत्र शोध घेऊनही कुठेही तिचा थांगपत्ता न लागल्याने शेवटी मुलीच्या आईने मुलगी बेपत्ता झाल्याची पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. मुलीला कुणी तरी फूस लावून पळवून नेल्याचेही मुलीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. महिलेच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  महाविद्यालयीन शिक्षण घेणारी १६ वर्षीय विद्यार्थिनी २९ जुलैला रात्री ८ वाजताच्या सुमारास घरून अचानक बेपत्ता झाली. फिरायला जातो म्हणून ही अल्पवयीन मुलगी घराबाहेर पडली. मात्र उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेणे सुरु केले. मैत्रिणी व नातेवाईकांकडे शोध घेऊनही ती कुठेच आढळून न आल्याने पालक चांगलेच चिंतेत आले. शेवटी मुलीच्या आईने पोलिस स्टेशन गाठून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्य...

गावठी पिस्टल व जिवंत काडतूस जवळ बाळगणाऱ्या राजूर (कॉ.) येथील तरुणाला अटक

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  गुंड प्रवृत्तीचे युवक आता घातक शस्त्र जवळ बाळगू लागल्याने कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दहशतीचे वातावरण निर्माण करण्याकरिता या अपप्रवृतीच्या युवकांकडून अवैधरित्या शस्त्र खरेदी केले जात आहे. गुन्हेगारी जगतात आपले वर्चस्व निर्माण करण्याकरिता युवकांकडून अपराधीक घडामोडी घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. वणी शहरालगत असलेल्या राजूर (कॉ.) येथील तरुणाला अग्निशस्त्र व जिवंत काडतुसासह चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्या जवळून गावठी बनावटीची पिस्टल व जिवंत काडतूस यासह एक आलिशान कार असा एकूण २ लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मो. जमील अयनुल हक शेख (मौला) (२२) रा. राजूर (कॉ.) असे या अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.  चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींचा शोध घेत असतांनाच त्यांना राष्ट्रीय महामार्गावरील पाटाळा ता. भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथील पुलाखाली एक तरुण एका आलिशान कारमध्ये देशी पिस्टल जवळ बाळगू...

गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  राहत्या घरी गळफास घेऊन इसमाने आत्महत्या केल्याची घटना आज ३० जुलैला सायंकाळी ६.१० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. विजय मारोती डवरे (५८) असे या गळफास घेतलेल्या इसमाचे नाव आहे. नैराश्येनेतून आत्महत्या करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले असून एका पाठोपाठ होत असलेल्या आत्महत्यांनी तालुका हादरला आहे.  शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात वास्तव्यास असलेल्या विजय डवरे यांनी घरी कुणी नसल्याची संधी साधून घराच्या आड्याला गळफास लावून आपली जीवन यात्रा संपविली. कुटुंबातील सदस्य घरी परतल्यानंतर त्यांना विजय हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. नंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. विजय डवरे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहे. 

रंगनाथ स्वामी मंदिराजवळ मोटारसायकल दुरुस्तीच्या गॅरेजला भीषण आग

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  शहरातील रंगनाथ स्वामी मंदिराजवळ असलेल्या एका मोटसायकल दुरुस्तीच्या गॅरेजला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. आगीच्या ज्वाळांनी गॅरेजला पूर्णतः आपल्या कवेत घेतले असून गॅरेज मधील साहित्य पूर्णतः जाळून खाक झाले आहे. त्यामुळे गॅरेज मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाची वाहने वेळीच घटनास्थळी पोहचल्याने पुढील अनर्थ टळला. अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत असून आग काही प्रमाणात आटोक्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना ३० जुलैला रात्री अंदाजे ८.३० वाजताच्या सुमारास घडली.  रंगनाथ स्वामी मंदिराला लागून असलेल्या किंग स्कुटर या मोटारसायकल दुरुस्तीच्या गॅरेजला आज रात्री अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळांनी गॅरेजला पूर्णतः आपल्या कवेत घेतले. आगीत गॅरेज पूर्णपणे जळून खाक झाले आहे. गॅरेज मधील साहित्य आगीच्या भक्षस्थानी चढल्याने गॅरेज मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. गॅरेजला आग लागल्...

रंगकाम करतांना दुर्दैवी मृत्यू झालेल्या खोब्रागडे कुटुंबियांचे विजय चोरडिया यांनी केले सांत्वन

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य व प्रतिष्ठित व्यापारी विजय चोरडिया यांच्या दातृत्व भावनेचा परत एकदा परिचय आला आहे. रंगकाम करतांना तिसऱ्या माळ्यावरून खाली पडून मृत्युमुखी पडलेल्या इसमाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विजय चोरडिया यांनी त्यांचे सांत्वन केले. या गरीब कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून ३१ हजार रुपये दिले. घरातील कर्त्या पुरुषाचा असा हा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे दुःखं पचविता येण्यासारखे नसले तरी कुणी सांत्वन व आधार दिला की दुःखातून बाहेर पडण्याची हिंमत मिळते. घरातील प्रमुख व्यक्तीच्या मृत्यूने दुःखात बुडालेल्या कुटुंबाला विजय चोरडिया यांनी आधार दिला. त्यांची भेट घेऊन त्यांचं दुःखं हलकं करण्याचा प्रयत्न केला. विजय चोरडिया यांच्या सदिच्छा भेटीने कुटुंबियांनाही गहिवरून आलं. त्यांनी यानंतरही या कुटुंबाला आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन दिल्याने त्यांना परिस्थितीशी झुंज देण्याचं बळ मिळालं आहे.  इमारतीला रंग देतांना तोल जाऊन तिसऱ्या माळ्यावरून खाली पडल्याने बंडू तुकाराम खोब्रागडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बंडू खोब्रागडे हे रंगकाम व मजुरी करून आपला व आपल्या परिवाराच...

नाला पार करणे शेतकऱ्याच्या जीवावर बेतले, शेवटी शेतकऱ्याचा मृतदेहच आढळला

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  मागील सात ते आठ दिवसांपासून वणी व मारेगाव तालुक्यात सुरु असलेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले आहेत. नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. तर नाल्यांना पूर आल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. नाल्यावरील पुलांवरून पाणी वाहू लागल्याने काही गावांचा जाण्यायेण्याचा मार्ग बंद झाला आहे. तसेच शेत शिवारातील नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे शेतात जाणे कठीण झाले आहे. अशातच प्रचंड प्रवाह असलेला नाला पार करून जाणे एका शेतकऱ्याच्या जीवावर बेतले आहे. शेताकडे जाण्याच्या मार्गात असलेला नाला पार करतांना पाण्याच्या प्रवाहात शेतकरी वाहून गेल्याची खळबळजनक घटना २९ जुलैला सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. मारेगावचे तहसीलदार निलावाड यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली. मेघश्याम नारायण वासाडे (५८) रा. चिचमंडळ ता. मारेगाव असे या पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मेघश्याम वासाडे हा शेतकरी जनावरे घेऊन शेतात जाण्याकरि...

राजकीय व सामाजिक क्षेत्रात तत्पर असलेल्या इजहारभाई शेख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष, न.प. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यात नेहमी तत्पर असलेले इजहारभाई शेख यांचा आज वाढदिवस ! त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🥀🥀🎂🎂 राजकीय व सामाजिक क्षेत्रात स्वतःची एक अलग ओळख निर्माण करून आपलं वेगळपण टिकवून ठेवणारे इजहारभाई आजही राजकारण व समाजकारणात तेवढेच तत्पर आहेत. राजकीय कार्य असो की सामाजिक उपक्रम ते नेहमीच पुढाकार घेतात. जनसेवेच्या कार्यात त्यांचा नेहमी हातभार लागतो. मदतगार म्हणून त्यांची शहरात ओळख आहे. गरजू गरिबांसाठी त्यांनी नेहमी मदतीचा हात पुढे केला आहे. कित्येकांना त्यांनी सढळ हाताने मदत केली आहे. सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अन्यायविरुद्धही त्यांनी वेळोवेळी आवाज उठविला आहे. पक्षासाठीचंही त्यांचं कार्य अपार आहे. निष्ठावान नेते म्हणून त्यांची पक्षात ओळख आहे. जनसेवा हे त्यांचं जिव्हाळ्याचं कार्य राहिलं आहे. समाजकार्यात स्वतःला वाहून घेणारे इजहारभाई एक हक्काचा माणूस म्हणून समोर आले आहे. सर्वांशीच त्यांचे सलोख्याचे संबंध राहिले आहे. एक कर्मठ राजकारणी व समाजधुरणी म्हणून नावा...

सरपंच वर्षा मडावी यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीने धरली विकासाची कास, आठ महिन्यात झाली लाखो रुपयांची विकासकामे

Image
  प्रशांत चंदनखेडे वणी  वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या विरकुंड ग्राम पंचायतीने विकासाची कास धरली असून गावातील विकासकामे करण्यावर भर दिला जात आहे. ग्रामपंचायतीत सत्ता बदल झाल्यानंतर विकासकामांना गती आली आहे. गावांमध्ये विकासकामांचा धडाकाच सुरु झाल्याने गाववासीयांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. माजी सरपंच कविता सोयाम यांच्या विरुद्ध ग्रा.प. सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केल्यानंतर वर्षा मडावी यांची सरपंच पदी वर्णी लागली. वर्षा मडावी यांनी सरपंच पदाची धुरा सांभाळल्यानंतर अवघ्या आठ महिन्यातच विकासकामांचा सपाटा लावला आहे. त्यांनी विकासकामांकरिता निधी खेचून आणल्याने गावात विकासकामांची गंगा वाहिली आहे. पाच गावांमिळून विरकुंड ही गट ग्रामपंचायत आहे. या पाचही गावातील विकासकामांना वर्षा मडावी यांनी हात घातल्याने गावांचा कायापालट होऊ लागला आहे. गावांमध्ये ठिकठिकाणी सिमेंट रस्ते व नाल्यांचे बांधकाम करण्यात आले असून गावात स्वछता ठेवण्यावरही भर दिला जात आहे. अंगणवाडीकरिताही सर्व नविन साहित्य उपलब्ध करून देण्यात आलं आहे. कचरा संकलनाकरिता घंटा गाडी खरेदी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीला ...

वणीच्या प्रवाशांना वरोरा टप्प्यावरून चढण्याउतरण्याची परवानगी देण्याची मागणी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  नागपूर व चंद्रपूर वरून वरोरा मार्गे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस वरोरा बसस्थानकावर न जाता टप्प्यावरून (रत्नमाला चौक) जात असल्याने वणी येथील प्रवाशांना प्रवास करतांना चांगल्याच अडचणी येत आहे. नागपूर वरून चंद्रपूर जाणाऱ्या बसेस वरोरा बसस्थानकावर जात नसल्याने वणीच्या प्रवाशांना टप्प्यावर उतरावे लागते. मात्र चंद्रपूर वरून वणीला जाणाऱ्या बसेस टप्प्यावरून प्रवाशांना घेत नसल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय होतांना दिसत आहे. प्रवाशांना बसस्थानकावर येण्याकरिता ऑटोचा नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे वरोरा टप्प्याला जुने बसस्थानक घोषित करून वणीला जाणाऱ्या प्रवाशांना तेथून बसमध्ये घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी वणी येथील नागरिकांनी एसटी महामंडळाच्या नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ विभागीय नियंत्रकांना निवेदनातून केली आहे.  चंद्रपूर वरून नागपूर व नागपूर वरून चंद्रपूर जाणाऱ्या बसेस वरोरा बसस्थानकावर न जाता वरोरा टप्प्यावरूनच जात असल्याने वणीच्या प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहे. टप्प्यावरून प्रवाशांना वरोरा बसस्थानकावर येण्याकरिता ऑटोचा नाहक खर्च उचलावा लाग...

एक महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या विवाहितेने राहत्या घरी घेतला गळफास

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  राहत्या घरी गळफास घेऊन युवतीने आत्महत्या केल्याची घटना २६ जुलैला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. वणी घुग्गुस मार्गावरील लालगुडा गावाजवळ असलेल्या सबा कॉलनी येथे ती आपल्या पती सोबत राहत होती. एक महिन्यापूर्वीच तिचे लग्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. घर कुणी नसल्याची संधी साधून तिने मृत्यूचा फास गळ्याभोवती आवळला. देवयानी निरज चट्टे (२४) असे या गळफास घेतलेल्या युवतीचे नाव आहे.  संसारिक जीवनाला जेमतेम सुरुवात झाली असतांनाच नवविवाहितेने नैराश्येतून जगाचा निरोप घेतला. एक महिन्यापूर्वीच देवयानी हीचा निरज चट्टे यांच्याशी विवाह झाला होता. संसारिक जीवनात रममाण होऊन सुखस्वप्ने रंगविण्याच्या दिवसांत तिने आत्मघाती निर्णय घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे. लालगुडा गावाजवळ असलेल्या सबा कॉलनी येथे ही विवाहितता राहत होती. सायंकाळी घरी कुणी नसल्याची संधी साधून तिने दोरीच्या साहाय्याने घरातील खोलीत गळफास लावला. पती घरी परतल्यानंतर त्याला देवयानी ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. नंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनाम...

इमारतीचे रंगकाम करतांना तोल जाऊन पडल्याने कामगाराचा मृत्यू

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  छोरीया ले-आऊट येथे एका इमारतीचे पेंटिंगचे काम करतांना तोल जाऊन खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना २५ जुलैला दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. बंडू तुकाराम खोब्रागडे (५०) रा. रंगारीपुरा असे या कामगाराचे नाव आहे.  बंडू खोब्रागडे हे रंगकाम व मजुरी करायचे. छोरीया ले-आऊट येथे एका इमारतीला रंग देत असतांना त्यांचा तोल गेला व ते इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून खाली पडले. त्यामुळे त्यांना जबर मार लागला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन अति रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ते इमारतीवरून खाली कोसळताच त्यांच्या सहकारी कामगारांनी तात्काळ त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना ही माहिती देण्यात आली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता पाठविला. त्यांच्या अशा या अकाली मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्च्यात एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. घटनेचा पुढील...

तालुक्यात अतिवृष्टी, २६४ हेक्टर शेती प्रभावित, पाच गावांचा तुटला संपर्क

Image
  प्रशांत चंदनखेडे वणी  वणी शहरासह तालुक्यात मागील पाच दिवसांपासून सुरु असलेल्या कोसळधार पावसामुळे नदी नाल्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. वर्धा व निर्गुडा या दोन प्रमुख नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. नालेही तुडुंब भरले आहेत. १९ जुलैच्या सायंकाळ पासून शहरात जोरदार पाऊस सुरु आहे. कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचा जोर अजूनही कायम आहे. वणीसह तालुक्यातील आठ मंडळात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनही अलर्ट मोडवर आले आहे. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतात जाणे कठीण झाले आहे. पावसामुळे शेतातील कामेही खोळंबली आहेत. उशिरा पेरणी झालेल्या शेतातील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अतिवृष्टीमुळे २६४ हेक्टर शेती प्रभावित झाल्याची माहिती मिळाली असून निर्गुडा नदीला आलेल्या पुरामुळे पाच गावांचा संपर्क तुटला आहे. शहरासह तालुक्यात मागील पाच दिवसांपासून पावसाची रीप रीप सुरुच असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.   तालुक्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला. १९ जुलैला सायंकाळपासून सुरु झ...

रात्री झोपेत विषारी सापाचा बापलेकांना दंश, चिमुकला दगावला तर वडिल देत आहे मृत्यूशी झुंज

Image
प्रशांत चंदनखेडे वणी रात्री झोपेत विषारी सापाने दंश केल्याने १६ महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर वडील अत्यवस्थ असल्याची घटना २३ जुलैला मध्यरात्री शास्त्री नगर येथे घडली. दक्षित सुमित नेलावार असे या सर्प दंशाने मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. तर वडील सुमित नेलावार (३४) यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे.   शास्त्री नगर परिसरातील मोक्षधाम जवळ कुडाच्या घरात परिवारासह राहत असलेले सुमित नेलावार हे मजुरी करून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात.. रात्री नेहमी प्रमाणे ते परिवारासह घरात झोपले असतांना नजर चुकवून घरात शिरलेल्या विषारी सापाने बापलेकांना दंश केला. आधी या विषारी सापाने चिमुकल्याला चावा घेतला. रात्री २ वाजता अचानक मुलगा जोरजोरात रडायला लागल्याने वडील त्याला कुशीत घेऊन झोपविण्याचा प्रयत्न करीत असतांनाच वडिलांनाही सापाने दंश केला. सुमित यांना सापाने दंश केल्यानंतर त्यांना मुलालाही साप चावला असावा असा दाट संशय आला. त्यामुळे त्यांनी लगेच पत्नीला झोपेतून उठवून दक्षित व मला सापाने चावा घेतल्याचे सांगितले. त्या...

एसपीएम शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यांवर गतिरोधक तयार करण्याची मागणी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  शहरात सिमेंट रस्त्यांच्या बांधकामाला वेग आला आहे. पाण्याच्या टांकीपासून एसपीएम शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे नुकतेच काँक्रीटीकरण करण्यात आले. या रस्त्यावर प्रचंड उतार असून हा रस्ता नेहमी रहदारीने गजबजलेला असतो. विद्यार्थ्यांचेही या रस्त्याने सतत जाणे येणे सुरु असते. त्यामुळे या रस्त्यावर गतिरोधक तयार करणे गरजेचे झाले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासूनही सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. हा रस्ताही प्रचंड उताराचा असल्याने याठिकाणी देखील गतिरोध असणे आवश्यक आहे. त्यामुळे या धोकादायक उतार असलेल्या दोनही रस्त्यांवर गतिरोधक तयार करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी न.प. मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.  शहरातील पाण्याची टांकी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून एसपीएम शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले. हे दोनही रस्ते प्रचंड वर्दळीचे आहेत. या रस्त्यांवर शाळा व सेतु केंद्र असल्याने विद्यार्थी व नागरिकांचे सतत या रस्त्याने जाणे येणे सुरु असते. या दोन्ही रस्त्यांवर प्रचंड उतार असून छोटी वाहने या रस्त्याने सुस...

भाजपच्या उमेदवारीचा रस्ता आता व्हाया विजय चोरडिया असा जाणार, विजय चोरडिया यांनी कंबर कसल्याने विद्यमानांची वाट खडतर

Image
  प्रशांत चंदनखेडे वणी  विधानसभा निवडणूक अगदीच जवळ आल्याने राजकारण चांगलंच तापू लागलं आहे. पक्षांकडून उमेदवारी मिळविण्याकरिता रस्सीखेच सुरु झाली आहे. उमेदवारीसाठी आता दावेदारीही सांगितली जात आहे. राजकारणात मुरलेले व नवखेही उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. पक्षांकडून उमेदवारी मिळण्यासाठी दावे प्रतिदावे करण्यात येत असल्याने पक्षश्रेष्ठींसमोरही मोठा पेच निर्माण होणार आहे. त्यामुळे उमेदवारीवरून कुठे ख़ुशी तर कुठे नाराजीचा सूर उमटणार असून पक्षांतर्गत बंडखोरीचं राजकारण विधानसभा क्षेत्रांमध्ये पाहायला मिळणार आहे. वणी विधानसभा क्षेत्रात तर राजकीय हालचालींना अक्षरशः उधाण आले आहे. राजकीय घडामोडी तीव्र झाल्या आहेत. एकमेकांवर सरशी साधण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. एवढेच नाही तर उमेदवारी मिळावी म्हणून विविध डावपेच देखील आखले जात आहे. सध्या इच्छुकांच्या दिल्लीच्या वाऱ्या सुरु झाल्या आहेत. आपल्या क्षेत्रात आपलंच वारं असल्याचं पक्षश्रेष्ठींना पटवून दिलं जात आहे. तेंव्हा आता कोणत्या पक्षाचं तिकिट कुणाच्या वाट्याला जाते हे पाहणं औत्सुक्याचे  ठरणार आहे. यातच सामाजिक कार्यात स्व...

ठाणेदार अनिल बेहेरानी यांनी विद्यार्थ्यांना केलं कायदेविषयक मार्गदर्शन

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल बेहेरानी यांनी संताजी इंग्लिश मिडीयम स्कुल मधील विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत त्यांना कायदेविषयक सखोल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पिस्तूल, बंदूक व रायफलचे देखील दर्शन घडविले. एरव्ही चित्रपट व टीव्ही मालिकांमधून बघायला मिळणारी ही शस्त्रास्त्रे विद्यार्थ्यांना प्रत्येक्षात बघायला मिळाली. या शस्त्रांच्या वापराबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती दिली. या शस्त्रांचे गुण दोषही त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या शस्त्रांचा बेकायदेशीर वापर केल्यास त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना अवगत केले. विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान मिळावे म्हणून ठाणेदार अनिल बेहेरानी यांनी संताजी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये कायदेविषयक कार्यशाळा घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास चर्चा केली.  ठाणेदार अनिल बेहेरानी यांचा कायद्याचा अभ्यास दांडगा आहे. त्यामुळे कायदेविषयक मार्गदर्शन करण्याची त्यांची तळमळ दिसून येते. कायद्याचा अभ्यास नसल्याने युवापिढीमध्ये गुन्हेगारी...

तालुक्यात बरसला दमदार पाऊस, धो-धो बरसलेल्या पावसाने तुडुंब भरले नदी नाले

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  पावसाळा सुरु होऊनही तालुक्यात दमदार पाऊस झाला नव्हता. कधी पाऊस दडी मारायचा तर कधी हलक्या पावसाच्या सरी बरसायच्या. सतत पावसाची उघडझाप सुरु होती. मात्र १९ जुलैला तालुक्यात जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. सायंकाळी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटांसह दमदार पाऊस बरसला. सर्वदूर बरसलेल्या या पावसाने नदी नाले तुडुंब भरले आहेत. शेत शिवारात पाणी साचल्याने शेतकरी चिंतेत आले आहेत. तालुक्यातून वाहणारी निर्गुडा नदी दुपदरी भरून वाहू लागली आहे. निर्गुडा नदी तुडुंब भरल्याने गणेशपूर पुलावरून पाणी वाहण्याची भिती वर्तविली जात आहे. कधी मुसळधार तर कधी संततधार पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र पावसामुळे जीवित व वित्तहानी झाल्याच्या घटना कुठेही घडल्या नाहीत. अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या परिस्थीचा सामना करण्यास प्रशासन सज्ज असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाकडून क्षणोक्षणी पूर परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.  १९ जुलैला सायंकाळी शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस बरसला. सायंकाळी आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले. काही क्षणातच मेघगर्जनेसह पावसाला सुर...

डीबी पथकाला गवसली दुचाकी चोरट्यांची टोळी, पाच दुचाकी चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने पोलिसांकडून दुचाकी चोरट्यांची शोध मोहीम राबविली जात आहे. उभ्या दुचाक्या चोरटे लंपास करू लागल्याने चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचा पोलिसांवर दबाव वाढू लागला आहे. त्यामुळे गुन्हे शोध पथक सतत चोरट्यांचा मागोवा घेत आहे. दुचाकी चोरट्यांच्या मागावर असलेल्या गुन्हे शोध पथकाने खबऱ्यांकडून मिळालेल्या माहिती वरून लगतच्या जिल्ह्यातून दोन, लगतच्या राज्यातून दोन तर वर्धा जिल्ह्यातून एक अशा एकूण पाच दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मोटारसायकल चोरट्यांची टोळीच डीबी पथकाने जेरबंद केली आहे. ही कार्यवाही नुकतीच करण्यात आली. शेख शादाब शेख हबीब (२०), मुजाहिद नजीम नासिर अहेमद (२१) दोन्ही रा. के.आर.के. कॉलनी आदिलाबाद, पवन पोहनकर (२१) रा. इंदिरा नगर वर्धा, दीपक शंकर मेश्राम (२०) रा. घुग्गुस जि. चंद्रपूर, प्रदीप उर्फ तात्या संजय शेरखुरे रा. पारधी बेडा धोपटाळा जि. चंद्रपूर अशी या पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या जवळून चोरीच्या तीन दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत.  ठाणेदार अनिल बेहेरानी यांनी दुचाकी चोरट्य...

अर्ध्यावर डाव मोडला, दोन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  शहरातील एका नामांकित मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल १७ जुलैला रात्रीच्या सुमारास घडली. सोनाली दिनेश निमसटकर वय अंदाजे २५ वर्षे रा. मंदर ता. वणी असे या मृतक महिलेचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वीच या महिलेचे लग्न झाले होते. तिला मुलबाळ होत नसल्याने ती उपचार घेत असल्याचे सांगण्यात येते. अशातच या दाम्पत्याला गर्भपिशवीची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आल्याने काल १७ जुलैला तिला शहरातील एका मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात भरती करण्यात आले. रात्री तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कुटुंबियांच्या आग्रहानंतर मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.  तालुक्यातील मंदर येथे वास्तव्यास असलेल्या व ग्रामपंचायतीमध्ये रोजगार सेवक म्हणून कार्यरत असलेल्या दिनेश निमसटकर यांचे दोन वर्षांपूर्वी सोनाली हिच्याशी लग्न झाले. लग्नाला दोन वर्षे होऊनही गर्भधारणा होत नसल्याने सोनाली उपचार घेत होती. अशातच या दाम्पत्याला गर्भपिशवीची शस्त्रक्रिया करण्...

खडबडा मोहल्ल्यात राडा, दोन भावंडांना केली बेदम मारहाण, विधिसंघर्षग्रस्त बालकांसह चार आरोपींवर गुन्हे दाखल

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  शुल्लक कारणांवरून झालेल्या वादाचा वचपा काढण्याकरिता टोळक्याने येऊन मारहाण करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. यात अल्पवयीन मुलेही मागे नाहीत. भाईगिरीचा आव आणून जुने वाद उकरून काढत एखाद्याला अमानुषपणे मारहाण करणे हा आता तरुणाईचा ट्रेंड बनला आहे. अल्पवयीनांच्या या बालबुद्धी कृत्यांमुळे त्याचा सामाजिक सलोख्यावर विपरीत परिणाम होण्याची भिती निर्माण झाली आहे. मोहरम निमित्त शहरात ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रम सुरु असतांना सवारी पाहण्याकरिता गेलेल्या दोन भावंडांना जुन्या वादातून बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत एका भावाचे डोके फुटल्याने त्याला टाके लागले आहेत. हा राडा घालणाऱ्यांमध्ये दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे. ही मारहाणीची घटना शहरातील खडबडा मोहल्ला परिसरात १५ जुलैला मध्यरात्री १ वाजता घडली. या प्रकरणी दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांसह चार आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.  याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार मागील वर्षी अल्पवयीन फिर्यादीच्या लहान भावासोबत अल्पवयीन आरोपीचा वाद झाला होता. त्याचा राग त्याने मनात धरून ठेवला. १५ ज...

शिरपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोड्याचा प्रयत्न फसला, दरोडेखोर अडकले पोलिसांच्या जाळ्यात

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना शिरपूर पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. मोहरम निमित्त पोलिस स्टेशन हद्दीत रात्रीची गस्त वाढविण्यात आल्याने गस्तीवर असलेल्या ठाणेदार माधव शिंदे यांना चिंचोली फाटा परिसरात ६ ते ७ जण दरोडा टाकण्यासाठी दबा धरून बसले असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली. या माहिती वरून ठाणेदार माधव शिंदे यांनी सपोनि रावसाहेब बुधावत यांच्या नेतृत्वात पोलिस पथक तयार केले. त्यांना घटनास्थळाकडे रवाना करून संशयितांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार पोलिस पथकाने घेराव घालून रात्री १ वाजता मोठ्या शिताफीने ही गुन्हेगारांची टोळी अटक केली. पोलिसांनी  घटनास्थळावरून  चार आरपींना अटक केली. तर तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. या चारही आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी त्यांच्या जवळून एक कार व दरोड्यासाठी उपयोगात येणारे साहित्य असा एकूण २ लाख ४२ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.   गुन्हेगारी क्षेत्रावर बारीक लक्ष ठेऊन अ...

भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   भरधाव कारच्या धडकेत पादचारी महिलेचा  दुर्दैवी  मृत्यू झाल्याची घटना १४ जुलैला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वणी मुकुटबन मार्गावरील पेटुर गावाजवळ घडली. मुकुटबन कडून वणीकडे जाणाऱ्या भरधाव कारची रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला जोरदार धडक बसली. यात ती गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात येत असतांना वाटेतच तिचा मृत्यू झाला. आशा जनार्धन नांदे (५०) रा. पेटूर असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.   वणी मुकुटबन मार्गावरील पेटुर येथे वास्तव्यास असलेल्या महिलेच्या नवीन घराचे बांधकाम सुरु असल्याने ती बांधकामाची पाहणी करण्याकरिता रस्ता ओलांडून जात असतांना भरधाव कारने (MH ३१ EA ८२२९) तिला जोरदार धडक दिली. या अपघातात ती गंभीर जखमी झाल्याने तिला आधी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने रुग्णालयीन डॉक्टरांनी महिलेला रेफर करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तिला नागपूर येथे हलविण्यात येत असतांना वाटेतच तिचा मृत्यू झाला. महिलेचं वास्तव्य असलेलं जुनं घर व बांधकाम सुरु असलेलं नवीन घर रोडच्या आजूबाजूला असल्यान...

अनावश्यक कामांवर निधीची उधळपट्टी, शहरात चांगल्या रस्त्यावर पुन्हा बांधला जात आहे रस्ता

Image
प्रशांत चंदनखेडे वणी आगामी निवडणुकांचा काळ लक्षात घेता शहरात विकासकामांना उधाण आलं आहे. शहरात विकासकामांचा सपाटाच सुरु झाला आहे. वरचेवर विकासकामे केली जात आहे. जुन्या रस्त्यांवर नवा साज चढविला जात आहे. विकासकामांची गती दाखविण्याकरिता चांगल्या रस्त्यांचेही परत काँक्रीटीकरण केले जात आहे. अनावश्यक कामांवर निधी उधळण्याचं काम सध्या जोरात सुरु आहे. काही वर्षांपूर्वीच बांधलेल्या व उत्तम स्थतीत असलेल्या सिमेंट रस्त्यावर परत काँक्रेटचा थर चढवून नव्याने बांधकाम करण्यात येत असल्याने अनावश्यक कामांवर निधी उधळण्याचा हा प्रकार आता सर्वांच्याच नजरेसमोर आला आहे. न.प. शाळा क्र. ५ समोरील रस्त्याच्या बांधकामाची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. उत्तम स्थितीत असलेल्या या सिमेंट रस्त्याचे परत काँक्रीटीकरण केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यावरून निधीचा गैर वापर कशाप्रकारे केला जातो, याचा नागरिकांना साक्षात्कार घडला आहे. शहरातील काही भागात रस्त्यांसाठी ओरड होत असतांना काही भागात मात्र रस्त्यावर रस्ता बांधला जात असल्याने विकासाचा हा कोणता फार्म्युला आहे, यावर शहरात चर्चा रंगली आहे. तेंव्हा व...