Posts

Showing posts from May, 2024

स्वतःच्या कर्तृत्वाने मोरेश्वर हा लॉर्ड्स टेलर व नंतर यशस्वी उद्योजक बनला, त्यांनी शून्यातून विश्व उभारलेल्या कर्तृत्वाची ही यशोगाथा

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   वणी सारख्या शहरात येऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या मोरेश्वरची ही यशोगाथा       हातात शेवटचे दीड रुपये होते. त्यात नवीन शहर. राहायचंच म्हटलं तरी लॉजचं भाडं दोन रुपये होतं. पुढं काय करायचं हा प्रश्न होताच. तरीही तो हिंमत हारला नाही. अमरावतीच्या एका व्यापाऱ्यानं पन्नास रुपयांची नोट मोडून त्याला 50 पैसे दिले. मग सकाळ झाली. त्याच्याही आयुष्याची ही नवीनच पहाट होती. खिशात एकही रुपया नव्हता. आणि इथूनच त्याच्या संघर्षाला सुरुवात झाली. स्वबळावर आणि अथक परिश्रमातून जिद्दीने पुढं चालून त्यांनं आपलं स्वतंत्र विश्व शून्यातून निर्माण केलं. व्यवसायात नाव कमावलं. या कर्तुत्ववान पुरुषाचं नाव आहे मोरेश्वर राघोबाजी उज्वलकर.  यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील करणवाडी हे त्यांचं गाव. प्राथमिक शिक्षण मोरेश्वर यांनी तिथेच घेतलं. वडील राघोबाजी टेलरिंगचा व्यवसाय आणि शेतमजुरी करायचे. मोरेश्वरसह चार भावंड आणि दोन बहिणी आहेत. घरी शेतीवाडी नसल्यामुळे हेदेखील शेतातली काम करायचे. मोरेश्वर 10 पैसे किलोप्रमाणे दिवसाला 40 किलो कापूस वेचायचा. गावातली पीठ गिरणी सा...

न.प. प्रशासनच बेजाबदारपणाचा कळस गाठते तेंव्हा....!

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी नगर पालिका सध्या कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत राहतांना दिसत आहे. वणी नगर पालिकेत अनागोंदी कारभार सुरु असून कुणाचेही कुणावर नियंत्रण राहिले नाही. नगर पालिकेचे कंत्राटदारही सैराट झाले असून सुरळीत पाणी पुरवठा व शहराची साफसफाई ठेवण्याची जबादारी ते इमाने इतबारे पार पडतांना दिसत नाही. शहरातील काही भागातील नाल्यांची साफसफाई वेळोवेळी होत नसल्याची ओरड आजही ऐकायला मिळत आहे. शहरात कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे. रस्त्याच्या बाजूला कचरा जमा झालेला दिसून येतो. रस्त्यांची साफसफाई देखील व्यवस्थित होतांना दिसत नाही. त्यामुळे रस्त्यांवरून सारखी धूळ उडतांना दिसते. नगर पालिका प्रशासन तर डोळे मिटून बसलं आहे. घंटा गाड्यांकडेही नगर पालिकेचं दुर्लक्ष झालेलं पहायला मिळत आहे. विनाक्रमांकाच्या घंटा गाड्या शहरात धावत आहेत. मद्यधुंद अवस्थेत चालक घंटा गाड्या चालवतांना दिसत आहेत. घंटा गाडीवरील एका मद्यधुंद चालकाने एका व्यक्तीला धडक दिल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर वायरल होत आहे. या घटनेत दैव बलवत्तर म्हणून एका चिमुकल्यावरील दुर्दैवी प्रसंग टळला. या घंटा गाडीवर नंबरच नसल्याचे दिसून ये...

शेतीच्या वादातून दिर व नणंदेची भावजयीला मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वडिलोपर्जित शेतीचा सुरु असलेला वाद विकोपाला गेला आणि प्रकरण मारहाणीपर्यंत पोहचले. दिराने घराशेजारी राहणाऱ्या आपल्या भावजयीला व तिच्या मुलांना शिवीगाळ व दमदाटी करीत काठीने जबर मारहाण केली. एवढेच नाही तर वडिलांची शेती हडप करण्याचा प्रयत्न केल्यास बघून घेण्याची धमकी देखील दिली. दिराबरोबरच दिराची पत्नी, नणंद व नणंदेच्या मुलाने देखील तिला शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार महिलेने पोलिस स्टेशनला नोंदविली आहे. महिलेच्या तक्रारी वरून पोलिसांनी दीर व नणंदेसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.  तालुक्यातील सुकणेगाव येथे राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये वडिलोपार्जित शेतीचा सुरु असलेला वाद हाणामारीपर्यंत पोहचला. लहान भाऊ व बहिणीने आपल्या भावजयीला व तिच्या मुलांना थापड, बुक्क्या व काठीने जबर मारहाण केली. डोक्यावर काठी मारण्यात आल्याने महिलेच्या डोक्याला दुखापत झाली आहे. १४ मे ला घडलेल्या या घटनेची तक्रार काल ३० मे ला पोलिस स्टेशनला नोंदविण्यात आली. प्रतिभा बंडू बोढाले ही महिला सुकणेगाव येथे आपल्या परिवारासह राहते. तिचे सासरे महादेव हरबाजी बोढाले (84) हे देखील त्यांच्या सोबतच ...

प्रतिबंधित कापूस बियाणे विक्री करणाऱ्या चौघांवर कार्यवाही, ८ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त

Image
प्रशांत चंदनखेडे वणी    शासनाने प्रतिबंधित केलेल्या कापूस बियाण्यांची अनधिकृतपणे विक्री करणाऱ्या चार जणांना वडकी व शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या जवळून ८ लाख १५ हजार व १८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही धडक कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखा पथकाने २७ व २९ मे ला केली. खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांची बी-बियाणे खरेदी करण्याची लगबग सुरु झाली आहे. या संधीचा फायदा घेण्याकरिता बोगस बियाणे विक्री करणारं रॅकेटही सक्रिय झालं आहे. प्रतिबंधित बियाण्यांची विक्री करून लाखो रुपयांची उलाढाल केली जात आहे. शिरपूर व वडकी पोलिस स्टेशन हद्दीत बनावट कापूस बियाण्यांची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली. पथकाने सापळा रचून प्रतिबंधित बियाण्यांची विक्री करणाऱ्या दोन जणांना अतिशय शिताफीने अटक केली. तर अनधिकृत बियाणे विक्री करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शेतीचा हंगाम जवळ आल्याने शेतकरी बी-बियाणे खरेदी करू लागले आहेत. कृषी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. या संधीचा फायदा उचललण्याकरिता अनधिकृ...

उत्पादन खर्च वाढला आणि उत्पन्न झाले कमी, संजय खाडे यांनी शेतकऱ्यांच्या मांडल्या व्यथा, बी-बियाण्यांच्या किंमती कमी करण्याची केली मागणी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   शेतीचा नवीन हंगाम अगदीच तोंडावर आलेला असतांनाही शेतकरी मात्र सुलतानी संकटातून अद्याप बाहेर पडलेला दिसत नाही. विमा कंपनी कडून पीक विम्याची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. शेतकरी विमा कंपनीकडे पाठपुरावा करून डबघाईस आला आहे. मात्र विमा कंपनी कडून शेतकऱ्यांना कुठलाच प्रतिसाद मिळतांना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होऊन शेती कसण्याची वेळ आली आहे. त्यातल्या त्यात बी-बियाणे व खतांच्याही किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. लागवड खर्च प्रचंड वाढल्याने शेतीच्या उत्पादनातून अत्यल्पच उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरात पडतांना दिसत आहे. त्यामुळे घाम गाळून मोती पिकवूनही बळीराजाची नेहमीच दैना झालेली पाहायला मिळते. उत्पादन खर्च वाढल्याने शेती कसूनही पदरात काहीच पडत नसल्याची खंत शेतकऱ्यांमधून व्यक्त होतांना दिसत आहे. बी-बियाणे व रासायनिक खतांच्या किमतीत झालेली वाढ तथा मशागतीचाही खर्च वाढल्याने शेतीच्या उत्पादनातून गुजराण होईल एवढंही उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच निसर्गाचाही लहरीपणा शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे ...

वणी तालुक्याचा ९२.५५ टक्के निकाल, दहावीच्या परीक्षेतही मुलींनीच मारली बाजी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   दहावीच्या परीक्षेतही मुलींनीच बाजी मारली असून मुलांपेक्षा मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण जास्त आहे. दहावीच्या परीक्षेत मुलीच अव्वल आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचे निकाल आज २७ मे ला ऑनलाईन जाहीर करण्यात आले. बारावीच्या परीक्षेप्रमाणे दहावीच्या परीक्षेतही मुलींनीच अग्रक्रम प्राप्त केला आहे. विद्यार्थिनींनी दहावीच्या परीक्षेतही आपला दबदबा कायम राखला आहे. अमरावती विभागातून यवतमाळ जिल्ह्याचा ९५ टक्के तर वणी तालुक्याचा ९२.५५ टक्के एवढा निकाल लागला आहे. तालुक्यात मुलींनीच अव्वल येण्याचा मान मिळविला आहे. तालुक्यातून २३३८ विद्यार्थ्यांनी यावर्षी दहावीची परीक्षा दिली होती. त्यात २१६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापकी ३९३ विद्यार्थी हे गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ८०३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६९९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २६९ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण गुण मिळाले आहेत.  शहरातील शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाचा ९६.३४ टक्के निकाल लागला असून या विद्यालयाची विद्यार्थिनी कु. आरती...

मनसेने उचलला उपचाराचा खर्च, आणि अत्यवस्थ अवस्थेतील आदित्य झाला ठणठणीत बरा

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी उपचाराचा खर्च उचलल्याने अत्यवस्थ अवस्थेतील आणखी एक रुग्ण ठणठणीत बरा झाला आहे. एका अपघातग्रस्त तरुणासाठी राजू उंबरकर हे एकप्रकारे देवदूत ठरले आहेत. चिंताजनक अवस्थेत असलेल्या तरुणाला त्यांच्या मदतीमुळे योग्य उपचार मिळाले. अपघातात गंभीर जखमी झाल्यांनतर जीवन मृत्यूशी संघर्ष करणाऱ्या शहरातील एका तरुणाला राजू उंबरकर यांच्या मदतीमुळे नवजीवन मिळालं आहे. रामपुरा येथील रहिवाशी असलेला आदित्य देठे हा १९ वर्षीय तरुण दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मेंदूला इजा होऊन मेंदू कायम स्वरूपी निकामी होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली होती. तरुणाच्या घरची परिस्थिती अगदीच बेताची. त्याच्या उपचाराचा खर्च उचलणं कुटुंबियांसाठी अशक्यप्राय होतं. मुलाची जीवन मृत्यूशी सुरु असलेली झुंज पाहून आई वडिलांचं काळीज फाटत होतं. उपचाराअभावी मुलावर दुदैवी प्रसंग ओढवू नये, या विवंचनेत कुटुंबीय असतांनाच रामपुरा येथील रहिवाशांनी राजू उंबरकर यांच्याकडे धाव घेतली. त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली. मदतीसाठी...

अखेर, महसूल अधिकाऱ्यांना कार्यवाहीचा मुहूर्त सापडला, रेती घाटावरून तीन हायवा ट्रक घेतले ताब्यात

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   वणी तालुक्यातील वर्धा नदीच्या अहेरी (बोरगाव) रेती घाटावरून मध्यरात्री रेती चोरी करणारे तीन हायवा ट्रक महसूल विभागाने ताब्यात घेतले आहे. अहेरी (बोरगाव) रेती घाटातून रेती चोरी करण्याचा तस्करांचा डाव महसूल विभागाने उधळून लावला असला तरी महसूल अधिकाऱ्यांच्या या कार्यवाहीची शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. रेती घाटांवरून रेती चोरी होत असल्याच्या कित्येक तक्रारी महसूल विभागाकडे करण्यात आल्या. पण महसूल अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर मात्र काळा चष्मा लागला होता. त्यामुळे मधुर संबंधात कटुत्व आलं, की वरिष्ठांचा दबाव वाढल्याने ही कार्यवाही करण्यात आली, हा आता चर्चेचा विषय बनला आहे. दिवसाढवळ्या रेतीची चोरी होत असतांना महसूल अधिकारी कधी रेती घाटाकडे फिरकले नाही. परंतु आता मध्यरात्री रेती घाटांवर जाऊन वाळू चोरीचा पर्दाफाश केला जात असल्याने महसूल विभागाच्या या धडक कार्यवाहीची शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. महसूल विभागाने २३ मे ला रात्री १ ते १.३० वाजताच्या सुमारास अहेरी (बोरगाव) रेती घाटावर धाड टाकून रेती चोरी करणारे तीन ट्रक ताब्यात घेतले. हे हायवा ट्रक नेमके कुणाचे हे मात्र अद्याप कळू ...

आयव्हीआरसीएल (IVRCL) कंपनी व सा.बा. विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची रविंद्र कांबळे यांची मागणी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  चंद्रपूर- करंजी या मुख्य मार्गाच्या देखभाल, दुरुस्ती व साफसफाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या आयव्हीआरसीएल (IVRCL) कंपनीवर तसेच या कंपनीवर कुठलेही नियंत्रण न ठेवणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी शिरपूर ठाणेदारांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे. रस्त्यावरील धुळ मातीमुळे दुचाकी स्लिप होऊन होणारे अपघात बरेच वाढले आहेत. अपघातात निष्पाप जीवांचे बळी जाऊ लागले आहेत. नुकताच बेलोरा फाट्यावर झालेला अपघातही दुचाकी स्लिप होऊनच झाल्याचे सांगण्यात येत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ मातीचे थर जमा झाले आहेत. त्यावरून मोटारसायकल गेल्यास ती स्लिप होते. त्यामुळे मोटारसायकल अपघाताच्या घटना वाढू लागल्या आहेत. टोल वसूल करणारी कंपनी मात्र रस्त्यावरील धूळ माती साफ करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देखील टोल वसूल करणाऱ्या कंपनीवर नियंत्रण ठेवण्यास असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे टोल कंपनी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दुचाकी स्लिप होऊन झालेल्या अपघातास कारणीभूत...

वैशाखी पौर्णिमेला घडला हा इतिहास, विश्व तारण्या महामानव बुद्ध आले जन्मास, रेल्वे स्टेशन येथे बुद्ध जयंती साजरी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  जगाला करुणा व शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती आज वणी शहर व तालुक्यात ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. वैशाख पौर्णिमेला तथागत भगवान बुद्ध यांचा जन्म झाला. वैशाख पौर्णिमेलाच त्यांना ज्ञान प्राप्ती होऊन ते सम्यक सम्बुद्ध झाले. आणि वैशाख पौर्णिमेलाच त्यांचे महापरिनिर्वाण झाले. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनापासून तर मृत्यू पर्यंतच्या प्रवासात वैशाख पौर्णिमेचं महत्व फार दिसून येतं. त्यामुळे वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असंही संबोधलं जातं. बुद्ध जयंतीचा मंगलमय सोहळा "त्रिविध बुद्ध पौर्णिमा" म्हणून जगभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भारतातही बुद्ध जयंती उत्साहात साजरी केली जाते, शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील झेंड्याजवळही दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बुद्ध जयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. बुद्ध जयंती निमित्त पंचशील झेंड्याजवळ कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला मध्य रेल्वे कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व मध्य रेल्वे कर्मचारी ...

फार्मसीमध्ये करिअर करण्याची उत्तम संधी, सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये प्रवेश घेऊन निवडा सन्माननीय करिअर

Image
प्रशांत चंदनखेडे वणी     १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभनंदन   बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने अभिनंदन करतांना आम्हाला आनंद होत आहे. तुमच्या मेहनतीचे व समर्पणाचे फळ तुम्हाला मिळाले आहे. आणि ही फक्त उज्वल व आशादायी भविष्याची सुरुवात आहे. फार्मसी का निवडायची   फायदेशीर व प्रभावी करिअर करण्याकरिता फार्मसीची निवड हा एक उत्तम पर्याय आहे. एक फार्मासिस्ट म्हणून तुम्ही आरोग्यसेवेमध्ये महत्वाची भूमिका बजावू शकता. तुमच्या औषधी ज्ञानातून तुम्ही रुग्णांची काळजी घेऊन त्यांचं जीवन वाचविण्यात मदत करू शकता. हे क्षेत्र संशोधन, क्लिनिकल सराव आणि फार्मास्युटिकल उद्योगात विविध संधी उपलब्ध करून देतं.  सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसी, वणी येथे सामिल व्हा ! सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीच्या माध्यमातून फार्मसीमध्ये यशस्वी करिअर करण्याच्या दिशेने पुढे पाऊल टाका. तुम्हाला सर्वोत्तम प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळण्याची आमची संस्था पूर्ण खात्री देते. तसेच आमच्या संस्थेतील अनुभवी प्राध्यापक वर्गाकडून उ...

मालवाहू वाहनावरील हेल्परच निघाला लुटपातीच्या घटनेचा मास्टरमाईंड, पोलिसांनी हेल्परसह तिघांना केली अटक

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  मालवाहू वाहनाला भररस्त्यात अडवून चालकाजवळील रोख रक्कम लुटणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून ५ दिवसांत या लुटपातीच्या घटनेचा छडा लावला आहे. मालवाहू वाहनावर जितेंद्र सोबत असलेला हेल्पर लक्ष्मण हाच विश्वासघातली निघाला असून त्यानेच आपल्या साथीदारांच्या मदतीने ही घटना घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. वणी येथील किराणा व्यवसायिकाच्या मालवाहू वाहनावर चालक व हेल्पर म्हणून काम करणारे दोघे जण ग्रामीण भागातील किराणा दुकानदारांना किराणा माल पोहचविण्याकरिता मालवाहू वाहन घेऊन गेले होते. यावेळी चालकाने काही किराणा दुकानदारांकडे असलेली थकबाकी देखील वसूल केली. त्यानंतर ते वणीला परतत असतांना घोन्सा मार्गावरील कोरंबी (मारेगाव) गावाजवळ अज्ञात लुटारूंनी रस्त्यात त्यांचे वाहन अडवून चालकाजवळील रोख रक्कम व मोबाईल हिसकावून पळ काढला. १६ मे ला ही घटना घडली. त्यानंतर या घटनेची पोलिस स्टेशनला तक्रार करण्यात आली. पोलिसांनी घटनेचा खोलात जाऊन तपास केला. शेवटी मालवाहू वाहनावरील मदतनीसच लुटपातीच्या घटनेचा सूत्रधार निघाला. किराणा व्यवसायिकाच्या नोकरानेच हा सिनेस्टाइल लुटपात घडवून आण...

कोळसा वाहतुकीच्या ट्रकची दुचाकीला धडक, एक जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकी वरील एक जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज १९ मे ला सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वणी घुग्गुस मार्गावरील बेलोरा फाट्याजवळ घडली. दुचाकी वरील एक जण ट्रकच्या चाकाखाली चिरडल्या गेला. तर दोन जण दुचाकी वरून उसळून लांब पडले. मुन्ना अजय गोवर्धन वय अंदाजे १९ वर्ष हा या अपघातात जागीच ठार झाला. तर हर्षल अर्जुनकर व प्रणय शंकर नवले हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांनाही चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. हे तीनही तरुण मूर्सा ता. भद्रावती जि. चंद्रपूर येथील रहिवाशी असल्याचे समजते. अपघाताची माहिती शिरपूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून जखमींना उपचारार्थ तर मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला.  घुग्गुस वरून नायगावकडे मोटारसायकलने ट्रिपल सीट जात असलेल्या दुचाकीस्वारांना (MH ३४ BQ २९४७) कोळसा भरून वणीकडे जात असलेल्या ट्रकची (MH ३४ BG ३७८३) जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात दुचाकी वरील एक जण हा ट्रकच्या चाकाखाली आल्याने...

बापरे...! अतिक्रमणाला अडथळा होऊ नये म्हणून चक्क झाडच तोडले

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   शहरात अतिक्रमण वाढत असतांना नगर पालिका प्रशासन मात्र मवाळ भूमिका घेतांना दिसत आहे. शहरातील प्रमुख रस्त्याच्या कडेला अतिक्रमणधारकांनी दुकाने थाटली असून खुल्या जागांवर कब्जा केला आहे. अतिक्रमण वाढल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. अतिक्रमणामुळे रहदारीला अडथळे निर्माण होत आहेत. नगर पालिका लाखो रुपये खर्चून अतिक्रमण हटाव मोहीम राबविते. मात्र कालांतराने अतिक्रमण जैसे थे च होते. वणी वरोरा या मुख्य मार्गाच्या काँक्रेटीकरणाचे काम सुरु करण्यापूर्वी या मार्गावरील संपूर्ण अतिक्रमण हटविण्यात आले होते. नगर पालिकेने या निमित्ताने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवून प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवरील सर्व अतिक्रमण हटविले होते. मात्र आता वणी वरोरा मार्गाच्या कॉंक्रेटीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मार्गालगत काँक्रेटचीच भूमिगत नाली बांधण्यात आली आहे. या नालीवर अतिक्रमण करण्याचा सपाटाच सुरु झाला असून नालीवर दुकाने लावण्याची स्पर्धा पहायला मिळत आहे. अतिक्रमणाला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून चक्क वृक्ष तोडली जात आहे. काँक्रेट नालीवरील एका अतिक्रमित दुकानासमोरील विशाल वृक्षच तोडण्यात आल्याच...

सहारा पार्क येथील घरफोडीचे तार नागपूरशी जुळले, नागपूर येथील चोरट्यांनी वणीत घर फोडले

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी नांदेपेरा मार्गावरील सहारा पार्क येथे भरदिवसा घरफोडी करणारे चोरटे तीन महिन्यानंतर पोलिसांच्या हाती लागले आहेत. गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा शोध लावून त्यांना अटक केली आहे. हे दोनही अट्टल चोरटे नागपूर येथील रहिवाशी असून ते चोरीच्या गुन्ह्यातच नागपूर व भंडारा तुरंगात शिक्षा भोगत होते. त्यांना वणी पोलिसांनी न्यायालयीन परवानगीने ताब्यात घेऊन येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता वणी पोलिस स्टेशनला आणले आहे. आकाश उर्फ गोलू दिलीप रेवडीया (२९) व पंकज श्रावण खोकरे (३१) दोघेही रा. हुडकेश्वर नागपूर अशी या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अट्टल चोरट्यांनी नावे आहेत. पळसोनी फाट्यावरील गोदाम रखवालदाराच्या खुनाचा उलगडा केल्यानंतर पोलिसांनी घरफोडीच्या घटनेचा छडा लावल्याने पोलिस अलर्ट मोडवर आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता पटवारी कॉलनी येथे राहत्या घरी पडलेल्या दरोड्याचाही पोलिस पर्दाफाश करतील काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  सहारा पार्क येथे कुटुंबासह राहत असलेल्या शंकर किसन घुग्गुल यांच्या बंद घराला चोरट्यांनी टार्गेट करून घरातील सोन्या...

तालुक्यात आत्महत्यांचं सत्र सुरूच, वांजरी येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी तालुक्यातील वांजरी येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १७ मे ला सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ओमकार किशोर लडके (१८) असे या गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. ओमकार हा दुपारी ४.३० वाजेपर्यंत गावात सर्वांच्या दृष्टीस पडला. नंतर त्याने घरी येऊन अचानक गळफास घेतला. ओमकारच्या मोठ्या वडिलांना तो घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ओमकारचे वडील किशोर लडके हे शेतकरी असून शेती सोबतच ते ऑटोचा व्यवसाय देखील करतात. तरुण मुलाने आत्महत्या केल्याने त्यांना जबर धक्का बसला आहे.  तालुक्यात नैराश्येतून आत्महत्या करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. तरुण मुलं आत्मघात करू लागल्याने पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. वांजरी येथील शेतकरी कुटुंबातील तरुण मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. राहत्या घरी पंख्याला दुपट्ट्याने गळफास लावून त्याने जीवनाचा शेवट केला. ओमकारच्या मोठ्या वडिलांना तो घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी ही माहिती लगेच आपल्या भावाला दिली, व ओमकारला खाली उतरून तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथील डॉक...

सात दिवसांत पाण्याचा प्रश्न न सुटल्यास नगर पालिकेसमोरच तीव्र आंदोलन, काँग्रेसचे संजय खाडे यांचा इशारा

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे शहरवासीयांना नागरी सुविधेसह विविध समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. शहरात सध्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली असून पाण्याचे स्रोत मुबलक असतांनाही शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे शहरात पाण्याचा दुष्काळ निर्माण झाला आहे. पाणी पुरवठ्यातील अनियमिततेमुळे शहरवासीयांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. भर उन्हात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. काही भागातील नळ एका आठवड्यांनी तर काही भागात नळच येत नसल्याने येथील रहिवाशांना स्वखर्चाने पाण्याचे टँकर बोलवावे लागत आहे. सदोष पाणीपुरवठ्यामुळे शहरात पाण्याचा प्रश्न पेटला असून पाण्याच्या समस्येला घेऊन नागरिक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. शहरात निर्माण झालेली पाण्याची भीषण समस्या लक्षात घेता काँग्रेसचे संजय खाडे यांनी नगर पालिका प्रशासनाला धारेवर धरले. सात दिवसांच्या आत शहरातील पाण्याचा प्रश्न न सुटल्यास नगर पालिकेसमोरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात...

भरदिवसा वाहन चालकाला रस्त्यात अडवून लुटले, किराणा मालाच्या वसुलीचे ८० हजार रुपये नेले लुटून

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  ग्रामीण भागातील किराणा दुकानदारांना किराणा माल पोहचवून वणीला परत येणाऱ्या वाहन चालकाला भरदिवसा रस्त्यात अडवून त्याच्या जवळील रोख रक्कम लुटल्याची खळबळजनक घटना १६ मे ला सायंकाळी ६.३० वाजता कोरंबी (मारेगाव) येथील जनता शाळेसमोर घडली. अज्ञात चार लुटारूंनी भररस्त्यात मालवाहू वाहन अडवून किराणा मालाच्या थकबाकी वसुलीतुन मिळालेले ८० हजार ७०० रुपये लुटले. तसेच वाहन चालकाचा मोबाईल हिसकावून त्यांनी दुचाकींवरून पळ काढला. भरदिवसा घडलेल्या या लुटपातीच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अज्ञात लुटारूंनी लुटपात केल्याची तक्रार पोलिस स्टेशनला करण्यात आली असून पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.  शहरातील वाहेगुरू किराणा भंडार या दुकानातून ग्रामीण भागातील किराणा दुकरनदारांना किराणा मालाचा पुरवठा करण्यात येतो. राजेश तारुणा यांच्या मालकीचे हे किराणा दुकान असून ते मालवाहू वाहनातून चिल्लर विक्रेत्यांना किराणा माल पोहचवितात. १६ मे ला त्यांचा वाहन चालक जितेंद्र तुळशीराम रिंगोले (३२) हा किराणा माल भरलेले वाहन घेऊन ग्रामीण भागात माल पोहचविण्या...

अतिक्रमित जागेवरील पक्क्या बांधकामावरही चालविला जेसीबी, वणी वरोरा मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी वरोरा मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरुद्ध बाजूला जिल्हा परिषदेच्या मालकीची जागा असून या जागेवर अद्यावत व प्रशस्त क्रीडा संकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिली होती. त्यानुषंगाने या मैदानावरील झाडे झुडपे जेसीबीने हटविण्यात आली असून काटेरी झुडपं हटल्याने हे मैदान पूर्णतः सपाट झाले आहे. आता या जागेवर ज्यांनी अतिक्रम केले आहे, त्या अतिक्रमणावर देखील बुलडोजर चालविण्यात येत असून या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम १६ मे पासून हाती घेण्यात आली आहे. शासकीय मालकी हक्काच्या या जागेवर अनेकांनी कब्जा करून पक्के बांधकाम केले आहे. या पक्क्या बांधकामावरही आता जेसीबी चालविला जात आहे. काही नागरिक या जागेवर अनेक वर्षांपासून घरे बांधून राहत आहे. तर काही व्यावसायिकांनी या जागेवर अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले होते. या अतिक्रमित जागेवरील पक्क्या बांधकामावरही कालपासून जेसीबी चालविला जात असून शासकीय जागेवरील पक्के बांधकामही जमीनदोस्त करण्यात आले आहे. काल सायंकाळपर्यंत अतिक्रमण हटविण्यात आले असून आज देख...

गोदाम रखवालदाराचा खून करणारे आरोपी अखेर पोलिसांना गवसले, विधी संघर्षग्रस्त बालकासह तीन मारेकऱ्यांना ठोकल्या बेड्या

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  पळसोनी फाट्यावरील सिमेंट स्टील गोदामातील रखवालदाराची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींना तब्बल १८ दिवसानंतर पोलिसांनी कारंजा लाड जि. वाशीम येथून अटक केली आहे. आरोपित एका विधी संघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे. १०० सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी एका फुटेज मधील संशयित वाहनाच्या आधारे या खून प्रकरणाचा उलगडा केला. सीसीटीव्ही फुटेज मधील संशयित मालवाहू वाहन वणी परिसरात आढळल्याने पोलिसांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास करून तालुक्याला हादरवून सोडणाऱ्या या खुनाच्या घटनेचा छडा लावला. गोदामात चोरी करण्याच्या उद्देशानेच आरोपींनी रखवालदाराचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी चोरी व खून प्रकरणात अटक केलेल्या आरोपींमध्ये अजीम शहा रमजान शहा (३५) रा. नुरनगर, कलंदरी मस्जिद जवळ, कारंजा लाड ता. कारंजा जि. वाशीम, मोहम्मद उमर अब्दुल गणी (३६) बेबी सालपुरा, जुन्या सरकारी दवाखान्या जवळ कारंजा लाड ता. कारंजा जि. वाशीम तथा एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. १४ मे ला उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे यांनी स्वतः पोलिस पथकासह कारंजा लाड येथे जाऊन आरोपींबाबत शहानिशा करून त्यांना बेड्...

विस दिवसांपासून नळाला पाणी नाही, नियमित पाणीकर भरूनही करावा लागतो पाणी टंचाईचा सामना

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  नगर पालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शहरातील काही भागांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. २० ते २५ दिवस झाले तरी नळाला पाणी येत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील गुरुनगर परिसरातील काही घरांना नळाद्वारे पाणी पुरवठाच होत नसल्याच्या तक्रारी नगर पालिका प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत. नळाद्वारे पाणी येत नसल्याने येथील रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नळ येत नसल्याच्या तक्रारी करूनही नगर पालिका प्रशासन मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे येथील रहिवाशांमधून कमालीचा रोष व्यक्त होतांना दिसत आहे. नियमित पाणीकर भरूनही अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने येथील नागरिक कमालीचे संतापले आहेत. गुरूनगर परिसरातील हनुमान मंदिरासमोरील भागात नळाला पाणी येत नसल्याने याठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना स्वखर्चाने पाण्याचे टँकर बोलवावे लागत आहे. या भागातील काही घरांना २० ते २५ दिवसांपासून नळाद्वारे पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनाच धारेवर धरले. या भागातील पाण्याची समस्या त्वरित दूर न केल्यास...

मनसेकडे वाढू लागला युवकांचा कल, तरोडा येथील युवकांचा मनसेत प्रवेश

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या कार्यतत्परतेमुळे युवकांचा कल मनसेकडे वाढू लागला आहे. राजू उंबरकर यांनी युवकांचे हित जोपासण्याचे काम केले असून अनेकांचे रोजगाराचे प्रश्न सोडविले आहेत. शेतकरी, कष्टकरी व शेतमजुरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी नेहमी आवाज उठविला आहे. जनतेचे प्रश्न व समस्या सोडविण्याकरिता ते नेहमीच तत्पर असतात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या असो की आर्थिक, त्या राजू उंबरकर यांच्या पर्यंत आल्यास त्याचं निराकरण नक्कीच झालं आहे. आर्थिक कमकुवत घटकांना त्यांनी नेहमीच मदतीचा हात दिला आहे. अनेकांचा उपचाराचा व उपजीविकेचा खर्चही त्यांनी उचलला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाची बस सेवा उपलब्ध करून देण्यातही त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे. त्यांच्या याच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यांनी प्रेरित होऊन युवा वर्ग राजू उंबरकर यांच्याशी जुळू लागला आहे. काही दिवसांपूर्वी मुकुटबन व आसपासच्या गावातील नागरिकांनी मनसेत मोठ्या संख्येने प्रवेश घेतला होता. तर आता तरोडा येथील युवकांनी राजू उंबरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन...

आशा बियरबारमध्ये तरुणांच्या दोन गटात राडा, मद्यपींच्या हुडदंग घालण्याने परिसरातील नागरिक आले धास्तीत

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी वरोरा मार्गावरून गौरकार कॉलनीकडे जाणाऱ्या वळण रस्त्यावर रहिवाशी वस्तीलगत असलेल्या आशा बियरबारमध्ये तरुणांच्या दोन गटात तुफान राडा झाला. दोनही गटातील तरुणांनी एकमेकांना प्रचंड मारहाण केली. एवढेच नाही तर काचेचे ग्लास एकमेकांवर भिरकावण्यात आले. काचेचा ग्लास लागल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येते. रक्तबंबाळ अवस्थेतच त्याला त्याच्या मित्रांनी रुग्णालयात दाखल केले. ही फिल्मी स्टाईल हाणामारी बार मधील तिसऱ्या डोळ्यात कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे. टपोरी तरुणांच्या या भाईगिरीमुळे शहरातील शांतता भंग होतांना दिसत आहे. शुल्लक वादातून एकमेकांवरील राग मनात धरून ठेवण्याचे प्रमाण फारच वाढले आहे. शुल्लक कारणांवरून वाद झाला की आपल्या साथीदारांना बोलावयाचे आणि आपला जोर आजमावायचा हा प्रकार आता खूपच वाढला आहे. तरुणांच्या या राड्यालाही जुन्या वादाची किनार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. आशा बारमध्ये मद्य सेवन करणारे मद्यपी कधी बारमध्ये तर कधी बारच्या बाहेर नेहमी धिंगाणा घालत असल्याने येथील रहिवाशी कमालीचे त्रस्त झाले आहेत. काही दिव...